पश्चिम महाराष्ट्र

कर्जमाफीमुळे कोल्हापूरात शेतकरी सुखावला 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेव्दारे शेती आणि शेतकरी यांना दिलासा देण्याचे काम सुरू असून कोल्हापूर जिल्ह्यात या योजनेचा 43 हजार 304 शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. यातून गरजू शेतकऱ्यांना दिलासा, तर प्रामाणिकपणे नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. 

फुलेवाडी येथील महादेव लाड व सदाशिव लाड या शेतकऱ्यांनी अनुक्रमे 1 लाख 50 हजार व 1 लाख 80 हजार इतके शेतीसाठी कर्ज घेतले होते. त्यांनी या कर्जाची नियमित परतफेड केल्याने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून त्यांना 25 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळाल्याने त्यांनी शासनाने आमच्या प्रामाणिकपणाची दखल घेतली आणि हे अनुदान दिले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तर आळते येथील हुसेन मुजावर यांनी आपली दोन एकर शेती असून, या शेतीसाठी घेतलेले 22 हजार 500 रुपये कर्ज माफ झाले आहे, असे सांगितले. 

हातकणंगले तालुक्‍यातील लक्ष्मीवाडी येथील महादेव हांडे यांनी आपणाला 96 हजार रुपये, तर दीपक पाटील यांनी 1 लाख 17 हजार रुपये कर्जमाफी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. याप्रमाणेच हातकणंगले, करवीर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनीही कर्जमाफीबद्दल शासनाचे आभार मानले. तर अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

Apple Bug : अ‍ॅपलच्या यूजर्सना भेडसावतेय वेगळीच समस्या; रिसेट करावा लागतोय Apple ID पासवर्ड

लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलाने केली मोठी चूक; नवरीमुलीने थेट लग्न मोडलं

Viral Video: शिक्षिकेची गुंडागर्दी! शेजारच्या घरात घुसून गोंधळ, लहान मुलासह तीन जखमी.. व्हिडिओ व्हायरल

International Labour Day : राजीनाम्यानंतर नोटीस कालावधी पूर्ण करणे बंधनकारक आहे का? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT