पश्चिम महाराष्ट्र

शाळांतील अंतर तपासण्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांना सुचना

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयास गावागावांतून होत असलेला विरोध पाहता ज्या शाळा बंद होणार आहेत, त्यांच्यातील अंतर तपासण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आली. शाळा बंदविरोधात संतप्त प्रतिक्रिया पाहता अंतर तपासण्याच्या निर्णयामुळे प्रक्रिया रेंगाळण्याची चिन्हे आहेत.

राज्यातील १ हजार ३१४, कोल्हापूर विभागातील ४६३ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ३४ शाळा शासनाच्या निर्णयामुळे बंद होणार होत्या. शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर असणाऱ्या डोंगरी दुर्गम भागातील मुलांसाठी वाड्या-वस्त्यांवर शाळा सुरू केल्या.

दृष्टिक्षेपात बंद होणाऱ्या शाळा

  •  राज्यात ५ हजार शाळा बंदचा निर्णय 

  •  पहिल्या टप्प्यात १३१४ शाळा

  •  कोल्हापूर विभागात ४६३ शाळा

  •  जिल्ह्यात ३४ शाळा

वस्तीशाळांबरोबरच एक किलोमीटर परिसरात प्राथमिक शिक्षणाची सोय झाली; मात्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने गुणवत्ता व पटसंख्या घसरल्याचे कारण पुढे करत राज्यातील दहा पटापर्यंतच्या सरसकट सुमारे पाच हजार शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात १ हजार ३१४ शाळा बंद करण्याबाबत जिल्हा परिषदांना आदेश दिले. महाराष्ट्रातील डोंगरी, दुर्गम भागातील तसेच वाड्या-वस्त्यांवरील शाळांचा विचार न करता शासनाने हा सरसकट निर्णय घेतल्याने त्याला विरोध सुरू झाला. 

सर्वेक्षण नाहीच
साठ विद्यार्थी संख्येसाठी दोन शिक्षक व एक किलोमीटर परिसरात प्राथमिक शाळा हवी, असे शिक्षण हक्क कायदा सांगतो. मग दहा पटसंख्येच्या आतील शाळा शासन का बंद करत आहे? शिक्षणापासून एकही मूल वंचित राहायला नको असेल, तर कमी पटसंख्येचे कारण पुढे करत शाळा बंद करण्याचे षड्‌यंत्र थांबवायला पाहिजे, अशी भूमिका विविध शिक्षक संघटनांनी घेतली. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करत असताना राज्यातील वाड्यावस्त्या, पाडा, बेडा, तांडा यांचे सर्वेक्षणच केलेले नाही.

राज्यातील वाड्या-वस्त्यांवर शाळा झाल्याने विद्यार्थ्यांची दरवर्षी होणारी गळती थांबली. शाळाबाह्य मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली असून, कमी पटसंख्या असलेल्या या शाळा शिक्षणापासून वंचित असणाऱ्यांच्या शाळा आहेत, ही गोष्ट शासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर आता अंतर तपासणीच्या सूचना आल्या.अशीही पोस्ट महाराष्ट्र शासनाच्या शाळा बंद निर्णयाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल मीडियावर एक पोस्ट फिरत आहे. 

जपानमध्ये कामी-शिराताकी नावाचं एक रेल्वे स्टेशन आहे. प्रवासी कमी झाल्याने जपान रेल्वे हा संपूर्ण मार्ग बंद करणार होती, पण तेवढ्यात त्यांना समजलं, की ‘काना हाराडा’ नावाची एक लहान मुलगी या रेल्वेचा वापर रोज शाळेत जाण्यासाठी करते. त्यामुळे तिचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत रेल्वे बंद न करण्याचे जपान रेल्वेने ठरविले आणि केवळ एका प्रवाशासाठी ही रेल्वे धावली. गेल्या वर्षी तिचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच ही रेल्वे बंद झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT