after ganesh visarjan establishment of ganesh murti in villages in belgum 
कोल्हापूर

विसर्जनानंतरही गणेशाची होते पुनर्प्रतिष्ठापना ; आनोख्या परंपरेच हे गाव

चेतन लक्‍केबैलकर

खानापूर : गणेशोत्सवात केवळ अकरा दिवस पुजले जाणारे गणराय खानापूर तालुक्‍याच्या पश्‍चिम घाटात वर्षभरासाठी गाव व जंगलाचे रक्षणकर्ते बनतात. जांगळीचा देव बनून ते गावच्या वेशीवर वर्षभर स्थिरावतात. विसर्जनानंतर एका श्रीमूर्तीची वेशीबाहेर विशिष्ट ठिकाणी प्रतिष्ठापना करण्याची अनोखी परंपरा या भागातील काही गावांत आहे.

पश्‍चिम घाटातील कणकुंबी परिसरात गणेश चतुर्थी पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते. अकरा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर गावातील सर्वच मूर्तींचे विसर्जन एकाचवेळी वाजतगाजत केले जाते. गावाजवळच्या ओढ्यात किंवा नदीत गणरायाचे विसर्जन केले जाते. इथपर्यंतच्या चालिरीती सगळीकडेच आहेत. पण, कणकुंबी, पारवाड, चिखले, चिगुळे, हुळंद, चोर्ला, मान, आमगावसह काही गावांत विसर्जनानंतर एक आकर्षक मूर्ती पाण्यातून बाहेर काढली जाते. त्या मूर्तीची सर्वजण पूजा करतात.

पुन्हा त्याच उत्साहात ती मूर्ती गावच्या वेशीवर विशिष्ठ ठिकाणी पुनर्प्रतिष्ठापित केली जाते. त्यानंतर हा गणराय त्या गावचा, जंगलाचा आणि गुराख्यांचा रक्षणकर्ता बनतो, अशी श्रद्धा आहे. शक्‍यतो हा जांगळीचा देव कुडाच्या झोपडीत विसावलेला दिसतो. ही परंपरा कधी व कुणी सुरु केली याबाबत कुणाला माहिती नाही. अलीकडच्या काळात नवी हुळंद हे गाव निर्माण झाले. या गावानेही ही परंपरा सुरू केली.

दाट जंगलात असलेल्या गावांत ही परंपरा पाहायला मिळते. त्याला गुराख्यांचा देव मानतात. गणराय जंगलात जाणाऱ्या गुराख्यांचे जंगली प्राण्यांपासून रक्षण करतो, अशी भावना आहे. 
वर्षातून एकदा या देवाची महापूजा केली जाते, अशी माहिती कणकुंबीतील दीपक वाडेकर यांनी दिली. कुणी गणरायाला शेती व शेतकऱ्यांचा तर कुणी गावचा राखणदार समजतो. पण, या भागातील लोकांची या देवावर श्रध्दा आहे, अशी माहिती चिखलेतील अजित गावडे यांनी दिली.

"तीस वर्षांपूर्वी नवी हुळंद गाव अस्तित्वात आले. तेव्हा परंपरेप्रमाणे ग्रामस्थांनी गणेश विसर्जनानंतर गावापासून जवळच झोपडी बांधून जांगळीचा देव बसविला. हा देव गावची राखण करतो. संकटापासून वाचवितो. संकटांना गावात शिरू देत नाही, अशी आमची भावना आहे."

- सावित्री गावडे, नवी हुळंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT