कोल्हापूर

अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; कासारवाडीतील घटना

शेतात पाणी पाजत असताना सायंकाळी साडेपाच वाजता ही दुर्घटना घडली

अभिजीत कुलकर्णी

नागाव : कासारवाडी (ता. हातकणंगले) येथे वीज पडून शेतमजूर ठार (farmer dead) झाला. भरत संभाजी वाणी (वय ३५, मुळ गाव निर्मळवाडी, ता. वडवणी, जि. बीड, सध्या राहणार कासारवाडी) असे त्याचे नाव आहे. कासारवाडी (kasarwadi) येथील मंडलिक मळ्यात शेतात पाणी पाजत असताना सायंकाळी साडेपाच वाजता ही दुर्घटना घडली.

याबाबत घटनास्थळी मिळालेली माहिती अशी, कासारवाडी येथील शरद मंडलिक यांच्या शेतामध्ये (farming) भरत वाणी हे मजूरीचे काम करतात. उसाच्या शेतीला पाणी पाजत ते मुलासह लिंबाच्या झाडाखाली उभे होते. पाचच्या सुमारास वीजेच्या कडकडाटासह पावसाला (heavy rain) सुरुवात झाली. अचानक वीज शेताच्या कडेला असलेल्या लिंबाच्या झाडावरती पडली. यामध्ये भरत वाणी व त्यांची मुले करण आणि अर्जुन हे झाडाखाली उभे असल्याने यांच्या अंगावरती वीज कोसळली. यामध्ये भरत वाणी याचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा करण किरकोळ जखमी झाला. भरत हा पत्नी व दोन मुलांसह (child) गेल्या पाच वर्षांपासून कासारवाडीतील मंडलिक मळ्यात मजुर म्हणून काम करत होते. उसाच्या शेताला पाणी पाजत असल्याने पत्नीला दूध घालण्यासाठी पाठवले होते. त्यामुळे दोन्ही मुलांना जवळ घेऊन भरत शेतामध्ये पाणी पाजत होता. अचानक वीज कोसळल्याने त्यांचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला घटनास्थळी त्यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT