Panchganga River Ichalkaranji esakal
कोल्हापूर

Panchganga River : पंचगंगा नदीत हजारो मृत माशांचा खच; घाटाला गटारगंगेचे स्वरूप, प्रशासनाचे नदीच्या प्रदूषणाकडे दुर्लक्ष

पंचगंगा नदीतील (Panchganga River) पाणी प्रदूषित झाले असून, त्यामुळे हजारो मासे (Fish) मृत झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

पंचगंगा नदीतील पाण्याने तळ गाठला आहे. घाट परिसरातील पात्र उथळ असल्यामुळे हा परिसर कोरडा पडला आहे, तर बंधाऱ्याच्या पश्‍चिमेस नदीपात्रात पाणी साचले आहे.

इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीतील (Panchganga River) पाणी प्रदूषित झाले असून, त्यामुळे हजारो मासे (Fish) मृत झाले आहेत. नदी पात्रात मृत माशांचा खच पडला असून, परिसरात दुर्गंधी पसरली आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत प्रशासकीय यंत्रणा गुंतली असताना दुसरीकडे पंचगंगा नदीच्या प्रदूषणाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी, घाटाला गटारगंगेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

पंचगंगा नदीतील पाण्याने तळ गाठला आहे. घाट परिसरातील पात्र उथळ असल्यामुळे हा परिसर कोरडा पडला आहे, तर बंधाऱ्याच्या पश्‍चिमेस नदीपात्रात पाणी साचले आहे. या पाण्याला काळाकुट्ट रंग आला आहे. खबरदारी म्हणून महापालिकेने चार दिवसांपूर्वीच पंचगंगा नदीतील उपसा बंद केला आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा बंद आहे. धरणातून पाणी सोडलेले नाही. त्यामुळे नदी प्रवाहित नाही. परिणामी, नदीपात्रात दूषित पाणी मोठ्या प्रमाणात मिसळले आहे. त्यामुळे बंधाऱ्यातील पाणी प्रदूषित झाले आहे. पाण्यातील ऑक्सिजनची (Oxygen) मात्रा कमी झाल्यामुळे मासे तडफडून मृत झाले.

पात्रात पाण्याच्या कडेला हजारो मासे मृत होऊन पडले आहेत. मृत झालेल्या लहान माशांचा तर अक्षरशः खच पडला आहे. मृत मासे सडू लागल्याने नदी घाट परिसरात दुर्गंधी पसरत आहे. वास्तविक त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी प्रशासनाची होती. मात्र, त्याकडे निवडणुकीच्या धांदलीत कुणाचेही लक्ष गेलेले नाही. एकिकडे पाणी तीव्र प्रदूषित झाले असतानाही बंधाऱ्यातील साचलेल्या पाण्यात नागरिकांची पोहण्यासाठी, अंघोळीसाठी वर्दळ कायम आहे. वास्तविक यावर निर्बंध घालण्याची आवश्यकता होती.

घाट परिसरात अस्वच्छता

पूर्वी नदी घाटावर कपडे, वाहने, जनावरे धुण्यास निर्बंध घालण्यात आले होते. अगदी पूजा विधी करण्यावरही मनाई करण्यात आली होती. काही कालावधीनंतर ही नियमावरील मागे पडली. सध्या घाट परिसर प्रचंड अस्वच्छ असून, सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सुंदर असलेल्या या परिसरात सध्या अवकळा आली आहे.

नदी प्रवाहित करण्याची गरज

या उन्हाळ्यात अनेकवेळा नदीतील पाण्याने तळ गाठला होता. पण, धरणांतून पाणी सोडल्यामुळे नदी प्रवाहित झाली होती. त्याचा फटका जलचरांना झाला नव्हता. आता मात्र प्रदूषणाची तीव्रता वाढली असून, नदीपात्रात साचलेले पाणी गटारीतील पाण्यापेक्षाही घाणेरडे आहे. अगदी चूळ भरण्यासाठीही तोंडात पाणी घेण्याचेही धाडस होणार नाही. त्यामुळेच मासे मृत झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs SAW, 1st T20I: जेमिमाह रोड्रिग्सचं शानदार अर्धशतक, स्मृती मानधनाचीही मिळाली साथ; भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय

Accident News:'अपघातात आर्टिकामधील तिघे ठार तर दोन जखमी'; धरणगाव-धुपेश्वर रोडवरील घटना, चालकाचे नियंत्रण सुटल अन्..

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 : राज्यात कुठं कुणाचा नगराध्यक्ष? दिवसभरातील निकालासंदर्भातील घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Jejuri Fire Incident Video : निवडणुकीच्या विजय जल्लोषादरम्यान मोठी आग; दोन नवनिर्वाचित नगरसेवक भाजले, अनेक लोक जखमी, जेजूरीतील धक्कादायक Video समोर...

Gadchiroli Municipal Result: गडचिरोलीत काँग्रेस उमेदवाराचा अवघ्या 'एका' मताने विजय; पराभूत मांडवगडेंचा निकालावर आक्षेप!

SCROLL FOR NEXT