Ajara Sugar Factory Election esakal
कोल्हापूर

Ajara Factory Election : आजरा कारखान्यासाठी दुरंगी लढत, 20 जागांसाठी 46 जण रिंगणात; भाजप, काँग्रेस-सेनेविरोधात NCP मैदानात

राष्ट्रवादीने पालकमंत्री मुश्रीफ यांची भेट घेवून निवडणूक रिंगणातून माघार घेणार असल्याचे सांगितले होते.

सकाळ डिजिटल टीम

आजरा कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी जिल्ह्याच्या नेतेमंडळींकडे बैठका सुरु होत्या.

आजरा : आजरा साखर कारखान्यासाठी (Ajara Sugar Factory Election) दुरंगी सामना रंगणार असल्याचे शुक्रवारी माघारीच्या शेवटच्यादिवशी स्पष्ट झाले. २० जागांसाठी ४६ जण रिंगणात आहेत. भाजप (BJP), कॉंग्रेस (Congress) व दोनही शिवसेना (Shiv Sena) यांच्या श्री. चाळोबादेव शेतकरी विकास आघाडीच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादीची श्री. रवळनाथ शेतकरी विकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे.

भटक्या विमुक्त जाती जमाती या गटात केवळ एक अर्ज राहिल्याने भाजप, कॉंग्रेस व सेनेचे संभाजी पाटील बिनविरोध निवडले गेले आहेत. आजरा कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी जिल्ह्याच्या नेतेमंडळींकडे बैठका सुरु होत्या.

पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे यांनी यामध्ये लक्ष घातले होते. पक्षनिहाय गटाचा विचार करून जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार केला होता. यामध्ये दोनही राष्ट्रवादीच्या वाट्याला सात जागा आल्या होत्या. जागा वाढवून द्याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीने केली होती. याबाबत निर्णय झाला नाही.

राष्ट्रवादीने पालकमंत्री मुश्रीफ यांची भेट घेवून निवडणूक रिंगणातून माघार घेणार असल्याचे सांगितले होते. यानंतर आमदार सतेज पाटील व आमदार विनय कोरे यांनी भाजप, कॉंग्रेस व शिवसेना या पॅनेलला हिरवा कंदील दाखवला. त्यानुसार भाजप, कॉंग्रेस व सेनेच्या श्री. चाळोबादेव शेतकरी विकास आघाडीची रचना झाली. दरम्यान, राष्ट्रवादीच्या माघारीनंतर तालुक्यात मोठ्या राजकीय घडामोडी झाल्या. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नेते व पदाधिकाऱ्यांना धारेवर धरत निवडणूक लढवण्यासाठी दबाव आणला. नेत्यांनी एकतर्फी विचार केला.

कार्यकर्त्यांना जमेत धरले नाही, असा आरोप केला. स्थानिक नेत्यांनी पालकमंत्री मुश्रीफांची भेट घेवून कार्यकर्त्यांच्या भावना मांडल्या. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. आज दिवसभरात राष्ट्रवादीने पॅनेल तयार करून मैदानात उतरवले. त्याचबरोबर कारखान्यासाठी मोठ्या संख्यने १७८ अर्ज दाखल झाले होते. छाननी प्रक्रियेनंतर १४६ अर्ज शिल्लक राहीले. आज ९९ जणांनी माघार घेतली. २० जागांसाठी ४६ जण रिंगणात असून ६ जण अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT