gram panchayat election 2021 atmosphere sangli 
कोल्हापूर

कोरोनात गावबंदी, अन् आता पायघड्या 

सकाळ वृत्तसेवा

पेड (सांगली) : कोरोनाच्या काळात पुणे, मुंबई यासह अन्य शहरातून गावाकडे परतणाऱ्या लोकांना गावात येऊ न देता गावाबाहेरील जिल्हा परिषद शाळा किंवा हायस्कूलमध्ये पंधरा दिवस मुक्कामी ठेवण्यात आलं होतं. अशा लोकांना ग्रामपंचायतीच्या मतदानाला बोलविण्याची वेळ उमेदवारावर आली आहे. 

गावकऱ्यांनी कोरोनाच्या काळात केलेल्या चांगल्या-वाईट कामाचा हिशेब देण्याची वेळ ग्रामपंचायत निवडणुकीत आली आहे. जुने वाद उकरून काढणे, जुन्या भांडणाचा वचपा काढणे, रुसवे-फुगवे, नफा नुकसान याचा हिशेब देण्याची जागा म्हणजे निवडणूक. त्यातल्या त्यात ग्रामपंचायत निवडणुकीत तर पिढ्यांचा वाद उफाळून येऊ शकतो. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एक एक मतदान महत्त्वाचे ठरणार असल्याने बाहेरगावी नोकरी किंवा अन्य कामधंदा निमित्त गेलेल्या लोकांशी संपर्क सध्या सुरू झाला आहे. 

मतदानादिवशी येऊन जा असा निरोप पाठविला जात आहे. मात्र नोकरी, कामधंदा निमित्त बाहेरगावी गेलेले लोकांना कोरोनाच्या कालावधीमध्ये गावामध्ये येऊ नका तुमच्यामुळे आमच्या गावात कोरोना पसरू शकतो असा निरोप मागील चार महिन्यापूर्वी देणारे आता मात्र निवडणुकीत मतदान करण्यासाठी या अशा विनवण्या करू लागले आहेत. 

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

Pune Crime: आषाढी वारीत मुलीवर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट, नराधमांना अटक; आरोपी निघाले...

Murud Crime : पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याचा संशय; नातेवाईकांनी रस्ता अडवला

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

SCROLL FOR NEXT