increase of panchganga river pollution
increase of panchganga river pollution 
कोल्हापूर

येथे मिळतेय स्वातंत्र्यातसुध्दा काळ्या पाण्याची शिक्षा 

संजय खूळ

गेली अनेक वर्षे पंचगंगा नदी काठच्या गावांना काळ्या पाण्याची शिक्षा भोगावी लागत असताना शासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी दरवर्षीच आराखड्याचे कागदी घोडे नाचवतात. नदीतील पाण्याने एकाच वेळी हजारो नागरिक कावीळसारख्या साथीच्या आजाराचे बळी पडून अनेकांना जीव गमवावा लागला. तरीही ना शासनाचे डोळे उघडले ना लोकप्रतिनिधींची संवेदना जागी झाली. हातकणंगले आणि शिरोळ तालुक्‍यातील नागरिकांना पंचगंगा नदीमुळे सोसाव्या लागणाऱ्या यातनांची मालिका आजपासून क्रमश: 

इचलकरंजी : गेली अनेक वर्षे हातकणंगले आणि शिरोळ तालुक्‍यातील नागरिकांचा पंचगंगा नदीतील काळ्या पाण्याबाबत आक्रोश सुरू आहे. मात्र याची जाणीव कोणालाच होत नाही. दरवर्षी जानेवारी महिना आला की सहा महिने काळ्या पाण्याची शिक्षा भोगणाऱ्या या नागरिकांबाबत खरेच शासन एवढे असंवेदनशील का बनले आहे व नागरिकांच्या जीवापेक्षा पंचगंगा नदीला प्रदूषित करणारे घटक महत्त्वाचे आहेत का असा प्रश्‍न पडतो. 

कोल्हापूरपासून पंचगंगा नदीच्या प्रदूषणाला सुरवात होते आणि शिरोळ तालुक्‍यातील तेरवाड बंधाऱ्यापर्यंत पाणी येईपर्यंत पाण्याचा रंग रूपच बदलून जातो. जनावरेही ज्या पाण्याकडे फिरकत नाहीत असे काळेकुट्ट पाणी पात्रात राहते. शिरोळ तालुक्‍यातील अनेक गावांना याच नदीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असल्याने अक्षरश: चार पाच महिने हे नागरिक काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असतात. 

पंचगंगा नदीस कारणीभूत ठरणारे अनेक घटक आहेत. यामध्ये लक्ष्मी औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी, इचलकरंजीतील औद्योगिक व नागरी वसाहतीतील सांडपाणी आणि यड्राव येथील पार्वती औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्याचा समावेश होतो. गेली अनेक वर्षे या सर्व घटकांवर कारवाई करण्याचे केवळ फार्सच सुरू आहेत. कधी इचलकरंजी नगरपालिकेवर फौजदारी गुन्हा दाखल होतो तर कधी प्रदूषण नियंत्रण मंडळ उद्योग बंदच्या नोटिसा काढून बाजू सावरून घेते. पावसाळा सुरू झाला की येणाऱ्या पावसाच्या पाण्याबरोबर पंचगंगा नदीचा प्रश्‍न वाहून जातो. 

आक्रोश कधी ऐकणार 
न्यायालयाने आदेश देऊनसुद्धा प्रदूषण रोखण्यासाठी कोणीच संवेदनशील बनत नाहीत. त्यामुळे अप्रत्यक्षपणे हजारो नागरिकांच्या आयुष्यात विषवल्ली कालवण्याचे काम या सर्व यंत्रणेत होत आहे. गेली अनेक वर्षे आक्रोश करणाऱ्या या नागरिकांच्या संवेदना संबंधित यंत्रणेला कधी जाणवणार असाच प्रश्‍न पडतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT