Kalamba water level at fifteen feet
Kalamba water level at fifteen feet 
कोल्हापूर

कळंबा पाणी पातळी पंधरा फुटांवर

सकाळवृत्तसेवा

कळंबा : बेसुमार पाणी उपशामुळे कळंबा तलावातील पाणी पातळी पंधरा फुटांवर पोचली आहे. त्यामुळे तलावांमधून महापालिका व ग्रामपंचायतीने चार एमएलडी पाणी उपसा कमी केला आहे. तसेच पूर्व-पश्‍चिम दक्षिण बाजूचे पात्र कोरडे पडल्यामुळे शाळकरी मुले क्रिकेट आणि फुटबॉल खेळत असल्याचे चित्र आहे. 

पाच रुपये दराने प्रति दहा हजार लिटर्सप्रमाणे होणारी रक्कम महापालिकेकडे भरणा करावी व कळंब्याला पर्यायी व्यवस्था म्हणून शिंगणापूर योजनेतून पाणी पुरवठा करणे शक्‍य होणार नाही, असे पत्र ग्रामपंचायतीला महापालिकेने पाठवले आहे, तर तलाव बांधणीसाठी ग्रामस्थांनी विनामोबदला जमिनी दिल्या आहेत. छत्रपती शाहू महाराजांनी अजीवन तलावातून गावाला पाणीपुरवठा करावा, असा ताम्रपट प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे गावासाठी तलाव राखीव ठेवावा, असे निवेदन ग्रामपंचायतीकडून महापालिकेला देण्यात येणार असल्याचे सरपंच सागर भोगम यांनी सांगितले. 

कळंबा, पाचगाव आणि निम्म्या शहराची जीवनदायिनी म्हणून कळंबा तलावाकडे पाहिले जाते. दररोज आठ एमएलडी पाणी उपसा करून येथील नागरिकांना पुरवठा केला जातो. मात्र, पावसाळ्यानंतर सहा महिन्यात तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केल्यामुळे पाणीपातळीत सतरा फुटाने घट झाली आहे. तलावाचे जलचक्र अबाधित ठेवण्यासाठी दहा फूट पाणीसाठा तलावात शिल्लक ठेवावा लागणार आहे. त्यामुळे कळंबा व शहरासाठी तलावांमधून सध्या स्थितीला पाच फूटच पाणी उपसा करावा लागणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

Crude Oil Prices: पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी! कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी घट

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT