कोल्हापूर

Kolhapur Bandh : कोल्हापुरात दोन गटांमध्ये हिंसक चकमक, जिल्हाधिकाऱ्यांनी उचलले मोठे पाऊल

Sandip Kapde

Kolhapur Bandh : औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचे कौतुक करणाऱ्या सोशल मीडिया पोस्टवरून कोल्हापुरात दोन गटांमध्ये हिंसक चकमक उडाली आहे. यामध्ये दोन्ही बाजूंनी जोरदार दगडफेक झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

कोल्हापूरचे एसपी महेंद्र पंडित यांनी सांगितले की, मंगळवारी औरंगजेबची स्तुती करणारी एक पोस्ट व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल झाली होती. याच्या निषेधार्थ हिंदू संघटनांनी बुधवारी कोल्हापूर बंदची घोषणा केली होती. या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

कोल्हापूर शहरात सध्या शांतता आहे. मात्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. शहरातील इंटरनेट बंद करण्यात आले आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावारु या दंगलीवर प्रतिक्रिया दिली आहे. काल घडलेल्या घटनेवर आज संध्याकाळी सर्व धर्माच्या नेत्यांना बैठकीसाठी बोलावण्यात येणार आहे. सर्वांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.

राहुल रेखावार म्हणाले, सर्व लोकप्रतिनिधींशी देखील माझी चर्चा झाली आहे. त्यांनी प्रशासनाला मदत करण्याचे वचन दिले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शांतता राहीले पाहिजे यामुळे जिल्ह्याची उन्नती होईल. आत जिल्ह्यात पूर्णपणे शांतता आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा जिल्ह्यात तैनात करण्यात आला.

सोशल मीडियावरवरील पोस्टवर दुर्लक्ष करा. परिस्थिती शांत राहण्यासाठी आम्ही वाटेल ते करु. कोल्हापूरचा इतिहास समतेचा आहे. सर्वधर्म समभावाचा आहे. याचे उदाहरण आपण सर्व जगाला दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहु महाराजांची ही धरती आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT