कोल्हापूर

'कोल्हापूर शहर भाजप धार्जिण नाही; जयश्री जाधव आमदार होतीलचं'

सुनील पाटील

कोल्हापूर : विधानसभेच्या कोल्हापूर (Kolhapur North Election 2022) उत्तर मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध करुन दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांना श्रंध्दाजली वाहूया, अशी विनंती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना स्वत: भेटून केली होती. या दोघांनीही त्याला दाद दिली नाही.

भाजपने कोल्हापर शहरवासियांवर ही पोटनिवडणूक लादली असली तरीही, कोल्हापूर शहर हे भाजप धार्जिण नाही, हे दाखवण्याची वेळ आली आहे. जयश्री जाधव यांच्यामाध्यमातून शहरातील पहिली महिला आमदार म्हणून विजयी होतील, आणि दिवंगत आमदार जाधव यांचे अधुरे कार्य पूर्ण करतील, असा विश्‍वास पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज व्यक्त केला. कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारार्थ केशवराव भोसले नाट्यगृहात महाविकास आघाडीचा मेळावा झाला. यावेळी पाटील व मुश्रीफ बोलत होते.

पाटील म्हणाले, उत्तरची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढावी, यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) जो निर्णय घेतला, त्यावर ठामपणे काम करण्याची भूमिका सर्वांनीच घेतली होती. यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व मित्र पक्षांना घेवून या निवडणुकीला सामोर जाण्यासाठी यंत्रणा गतिमान झाली आहे.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणून यांच्या नेतृत्वाखाली जो निर्णय होईल, तो ठामपणे पाळायचा अशी भूमिका घेतली आहे. ज्या-ज्या ठिकाणी पोट निवडणूका झाल्या, त्यात ज्या पक्षाचा उमेदवार होता, त्याच पक्षाने ती निवडणूक लढवावी, असा निर्णय झाला. कोरोनामध्ये अनेक नातेवाईक सोडून गेले. यात चंद्रकांत जाधव यांचाही समावेश आहे. कोरोना काळात त्यांनी लोकांना दिलासा देण्याचे काम केले. पण, त्यांचे काम अपूर्ण राहिले, हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी जयश्री जाधव यांच्यावर आहे. पोटनिवडणूक लादली आहे. कोल्हापूरवासिय याला दाद देणार नाहीत. जाधव यांच्या माघारी आपली जबाबदारी म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याने कामाला लागावे.

यावेळी, खासदार धैर्यशील माने, आमदार ऋृतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, आर. के. पोवार, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, सुरेश साळोखे, राजेश लाटकर आदी उपस्थित होते.

..तर मुख्यमंत्र्यांना कमीपणा येईल: मुश्रीफ

मंत्री मुश्रीफ म्हणाले, सामान्यांना आधार देण्यासाठी कै.जाधव यांनी परिश्रम केले. कोरोना काळात त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या प्रत्येक बैठक़ीला उपस्थित होते. पाच वर्ष ते काम करणार होते. त्यांना काम करता आले नाही. हे काम आता जयश्री जाधव पूर्ण करतील, त्यासाठी त्यांचे लाखो भाऊ त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहतील. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीच आता जाधव यांना पाठबळ दिले आहे. त्यांना विजयी करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. काही चुकीचे झाले तर त्याचा कमीपणा मुख्यमंत्र्यांना येवू शकतो. भाजपने मुख्यमंत्र्यांवर खालच्या पातळीवर टिका केली आहे. त्यांना उत्तर देण्याची वेळ आता आली आहे.

डबे वाटणाऱ्यांना डब्यात घालणार

प्लास्टिक, स्टिलचे डबे वाटणाऱ्यांना शहरवासिय डब्यात घालूनच पाठवतील. त्यामुळे कोण कितीही आमिष दाखवू देत त्याचा काहीही फरक पडणार नाही, असा टोला पाटील यांनी लगावला.

भाजपच १२ वाजणार

१२ एप्रिलला मतदान आहे. याच दिवशी कोल्हापुरात भाजपचे १२ वाजणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आजपासूनच कामाला लागावे, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

SCROLL FOR NEXT