kolhapur University student eligibility criteria result sakal
कोल्हापूर

Kolhapur University : पात्रता पूर्ण नसल्याने दिसेना निकाल!

पेपरमध्ये कमी लिहिल्याचा परिणाम; विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाकडून तपासणी सुरू

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : पात्रतेची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने काही विद्यार्थ्यांचे निकाल दिसत नसल्याचे चित्र आहे. पेपर कमी लिहिल्यामुळे देखील बहुतांश विद्यार्थ्यांच्या गुणांवर परिणाम झाला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी निकालाबाबत साशंकता व्यक्त केली आहे, अशा प्रत्येक विद्यार्थीनिहाय निकालातील तक्रारींबाबतची तपासणी शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने सुरू केली आहे.

बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी. अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या निकालाबाबत विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांनी साशंकता व्यक्त करत त्याबाबत न्याय देण्याची मागणी ‘अभाविप’च्या माध्यमातून विद्यापीठ प्रशासनाकडे केली आहे. या विद्यार्थ्यांनी केलेल्‍या तक्रारनुसार तपासणीचे काम परीक्षा मंडळाने सुरू केले.

त्यात काही विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेतील पात्रतेचा टप्पा आणि आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याने त्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला असल्याचे चित्र समोर आले. त्यामुळे त्यांचे निकाल सध्या दिसत नाही. काही विद्यार्थ्यांचे पूर्वीच्या परीक्षेतील एक-दोन विषय राहिले आहेत. त्यांचा निकाल कॉम्बिनेशन स्वरूपातील असतो. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचा निकाल दिसत नाही. कमी गुणांची तक्रार केलेल्यांपैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी त्यांचे पेपर कमी लिहिले आहेत. त्याचा परिणाम त्यांच्या गुणदानावर झाला आहे.

लवकरच साशंकता दूर करणार

निकालाबाबत एक हजार विद्यार्थ्यांनी लेखी स्वरूपात व्यक्त केलेल्या साशंकतेच्या अनुषंगाने आम्ही बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी या अभ्यासक्रमांच्या विभागनिहाय तपासणीचे काम सुरू केले आहे. प्रत्येक विद्यार्थीनिहाय पीआरएन क्रमांक संगणक प्रणालीमध्ये समाविष्ट करून त्यांच्या निकालाची वास्तव स्थिती जाणून घेतली जात आहे.

लवकरच संबंधित विद्यार्थ्यांची निकालाबाबतची साशंकता दूर केली जाईल. निकालात हॅशटॅग, स्टार असल्याचे आमच्या निदर्शनास आलेले नाही, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी छायांकित प्रत घ्यावी

पेपर पूर्ण सोडवून देखील कमी गुण मिळाल्याची ज्या विद्यार्थ्यांची तक्रार आहे, त्यांनी उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत घ्यावी. पूनर्मूल्यांकनासाठी अर्ज करावा. त्यानंतरच्या पडताळणीत गुणदानात मोठा फरक दिसून आल्यास सुधारित गुणदान होईल. पेपरमधील गुणदानात त्रुटी आढळून आल्यास संबंधितांवर विद्यापीठ नियमानुसार कारवाई केली जाईल, असे डॉ. जाधव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : पठ्ठ्याने भररस्त्यात पेट्रोल ओतून जाळली रिक्षा, पत्नी अडवत ओक्साबोक्सी रडली तरीही थांबला नाही... धक्कादायक कारण समोर

T20 World Cup 2026 साठी कांगारुंचा मास्टर प्लॅन! स्पर्धासाठी १५ जणांचा संघ जाहीर; कमिन्सचे पुनरागमन, पण कर्णधार कोण?

Viral Video: नवीन वर्षाच्या सुरुवातीला सिद्धीविनायक बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी, रांग पाहून बसेल धक्का

Tobacco Excise Duty: सिगारेट आणि पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! नवा कर लागू होणार; पण कधीपासून? तारीख आली समोर

Maharashtra SSC Exam Schedule 2026: तयारीला लागा! SSC बोर्ड परीक्षा 2026 वेळापत्रक जाहीर, पाहा पहिला कोणता पेपर

SCROLL FOR NEXT