minister hasan mushrif told zero covid plane
minister hasan mushrif told zero covid plane 
कोल्हापूर

रोगी शोधून काढला, तरच ते कुटुंब वाचेल ; मंत्री हसन मुश्रीफांनी सांगितला प्लॅन...

नरेंद्र बोते

कागल - कोरोना जागतिक महामारी आटोक्यात आणण्यासाठी सर्वच यंत्रणा जीवावर उदार होऊन अथकपणे काम करत आहेत. आता यापुढच्या काळात अधिक जबाबदारीने काम करून 'मिशन कोविड झिरो' हेच ध्येय घेऊन वाटचाल करूया, असा मंत्र ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला.
येथील डी.आर. माने महाविद्यालयात अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी, तालुक्यात प्रत्येक गावात घरोघरी नागरिकांची तपासणी करून संशयितांना तात्काळ बाजूला काढा अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, कोरोना नियंत्रणासाठी रोगी शोधून काढला, तरच ते कुटुंब वाचेल. लोकांनी सुद्धा लक्षणे आढळल्यास दुखणं अंगावर न काढता किंवा समाजाला न घाबरता स्वतः बाहेर येत तपासणी करून घेतली पाहिजे. बाधितांची संख्या अशीच वाढत राहिली तर उपचारासाठी बेड मिळणे मुश्कील होईल. जगभरात अनेक देशांनी विकसित केलेल्या कोरोना लसी दृष्टिक्षेपात आहेत. परंतु या माध्यमातून बाधितांवर उपचार होण्यासाठी काही अवधी लागणार आहे. 

ते म्हणाले, कागल तालुक्‍यात एकूण 141 जण कोरणा पॉझिटिव्ह आढळून आले. त्यापैकी 73 पूर्ण बरे झाले आहेत, 63 जणांवर उपचार सुरू आहेत. कागलमधील 3 व दौलतवाडी येथे 1 असे 4 मयत झाले आहेत. कागलच्या कोविड काळजी केंद्रासह इतर ठिकाणी ऑक्सीजनसह 40 बेडची व्यवस्था आहे.
येत्या काळात अडीचशे बेडची सुविधा करण्याचे नियोजन असून त्यातील 100 बेड ऑक्सिजनसह असणार आहेत.
ते म्हणाले, कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत असतानाच वैद्यकीय कर्मचारी अथकपणे रात्रंदिवस लढा देत आहेत. या संकटात सर्वात महत्त्वाची जबाबदारी तेच पार पाडत असून त्यांचे योगदान अतुलनीय असेच आहे.

बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, प्रांताधिकारी रामहरी भोसले, तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिता पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रेयस जुवेकर, पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव, कृषी अधिकारी श्री. माळी, बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. शिंदे, मुख्याधिकारी पंडित पाटील, मुख्याधिकारी संजय गायकवाड आदी उपस्थित होते.

सणादिवशीही कर्तव्यनिष्ठा 

प्रवीण काळबर म्हणाले, सव्वादोन महिन्यापूर्वी रमजान ईद होती. त्यादिवशीही कोरोना महामारीचा लढा देण्यासाठी बैठक झाली होती. आज बकरी ईद आहे. या दोन्ही दिवशी मंत्री हसन मुश्रीफ कर्तव्यभावनेने कोरोनाच्या लढाईत कंबर कसून आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT