कोल्हापूर

'सरकारला शेट्टींसोबतच्या शेतकऱ्यांचा बळी घ्यायचा आहे का?'

सकाळ डिजिटल टीम

मागील चार दिवसांपासून कोल्हापूर-सांगली तसेच राज्यातील पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राजु शेट्टी यांच्या नेतृत्वात पंचगंगा पायी पदयात्रा व परिक्रमेच्या माध्यमातुन चालत आहेत.

कोल्हापूर - या सरकारला राजु शेट्टी व त्यांच्यासोबत चालत येत असणाऱ्या शेतकऱ्यांचा बळी घ्यायचा आहे का? असा सवाल स्वाभिमानीच्या युवा आघाडी राज्य प्रवक्ता रणजित बागल यांनी केला आहे. मागील चार दिवसांपासून कोल्हापूर-सांगली तसेच राज्यातील पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राजु शेट्टी यांच्या नेतृत्वात पंचगंगा पायी पदयात्रा व परिक्रमेच्या माध्यमातुन चालत आहेत.

ते म्हणाले, आज राजु शेट्टी त्यांच्यासोबत हजारो पूरग्रस्त शेतकरी नृसिंहवाडीला नदीत जलसमाधी घेण्यासाठी कुच करत आहेत. या यात्रेला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. गावोगावी महिलांनी शेट्टींचे औक्षणाने स्वागत केले आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मिळालेली मदत तोकड्या स्वरूपाची असल्याने नुकसान भरून निघणार नाही. पूरग्रस्त बांधवांचा सरकारवर प्रचंड रोष आहे. या रोषाला वाचा फोडण्याचे काम ते करत आहेत.

पुढे ते म्हणाले, आज शेवटचा दिवस असताना हे सरकार राजु शेट्टींसोबतच्या हजारो शेतकऱ्यांच्या आक्रोशाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. शेतकरी जलसमाधी घेण्याच्या निर्णयापर्यंत गेले असताना सरकार पूरग्रस्तांच्या प्रश्नांवर कानाडोळा करत असल्याचा थेट आरोप रणजित बागल यांनी केला आहे. आता सरकारने शेतकऱ्यांच्या रोषाचा कडेलोट होण्याआधी आज तात्काळ मंत्रीमंडळ बैठक बोलावून, पूरग्रस्त शेतकऱ्यांना शेट्टी यांच्या मागणीनुसार सन्मानजनक मोबदला देवुन, हा पेटलेला वणवा विझवा' असे आवाहन बागल यांनी राज्यसरकारला केले आहे.

यादरम्यान राजु शेट्टी आणि चालणाऱ्या शेतकऱ्यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी, आम्ही सरकारच्या एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही. आज निर्णय न झाल्यास पेटलेल्या शेतकऱ्यांच्या या वणव्यात सरकार व त्यांचा अहंकार दोन्ही भस्मसात होतील असा इशारा त्यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय, कुणाची मदत नको'' अपंग असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यातील आमदार आठ महिने निधीविनाच'; फंडातील विविध कामांना ब्रेक, अधिवेशनात घोषणेची शक्यता

Viral Video: नवरा फोनमध्ये व्यस्त, पत्नी संतापली, रागात असं काही केलं की...; व्हिडिओच व्हायरल झाला, पाहा पोस्ट

Ashadhi Wari 2025: मृदंगाच्या थापाने वाढविली वारकऱ्यांची ऊर्जा; घळाटवाडीच्या गणेश महाराजांची पंढरीच्या वारीत वादनसेवा

Tata Group: टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला; ब्रोकरेजनेही दिला अलर्ट, गुंतवणूकदार चिंतेत

SCROLL FOR NEXT