कोल्हापूर

'सरकारला शेट्टींसोबतच्या शेतकऱ्यांचा बळी घ्यायचा आहे का?'

सकाळ डिजिटल टीम

मागील चार दिवसांपासून कोल्हापूर-सांगली तसेच राज्यातील पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राजु शेट्टी यांच्या नेतृत्वात पंचगंगा पायी पदयात्रा व परिक्रमेच्या माध्यमातुन चालत आहेत.

कोल्हापूर - या सरकारला राजु शेट्टी व त्यांच्यासोबत चालत येत असणाऱ्या शेतकऱ्यांचा बळी घ्यायचा आहे का? असा सवाल स्वाभिमानीच्या युवा आघाडी राज्य प्रवक्ता रणजित बागल यांनी केला आहे. मागील चार दिवसांपासून कोल्हापूर-सांगली तसेच राज्यातील पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राजु शेट्टी यांच्या नेतृत्वात पंचगंगा पायी पदयात्रा व परिक्रमेच्या माध्यमातुन चालत आहेत.

ते म्हणाले, आज राजु शेट्टी त्यांच्यासोबत हजारो पूरग्रस्त शेतकरी नृसिंहवाडीला नदीत जलसमाधी घेण्यासाठी कुच करत आहेत. या यात्रेला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. गावोगावी महिलांनी शेट्टींचे औक्षणाने स्वागत केले आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मिळालेली मदत तोकड्या स्वरूपाची असल्याने नुकसान भरून निघणार नाही. पूरग्रस्त बांधवांचा सरकारवर प्रचंड रोष आहे. या रोषाला वाचा फोडण्याचे काम ते करत आहेत.

पुढे ते म्हणाले, आज शेवटचा दिवस असताना हे सरकार राजु शेट्टींसोबतच्या हजारो शेतकऱ्यांच्या आक्रोशाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. शेतकरी जलसमाधी घेण्याच्या निर्णयापर्यंत गेले असताना सरकार पूरग्रस्तांच्या प्रश्नांवर कानाडोळा करत असल्याचा थेट आरोप रणजित बागल यांनी केला आहे. आता सरकारने शेतकऱ्यांच्या रोषाचा कडेलोट होण्याआधी आज तात्काळ मंत्रीमंडळ बैठक बोलावून, पूरग्रस्त शेतकऱ्यांना शेट्टी यांच्या मागणीनुसार सन्मानजनक मोबदला देवुन, हा पेटलेला वणवा विझवा' असे आवाहन बागल यांनी राज्यसरकारला केले आहे.

यादरम्यान राजु शेट्टी आणि चालणाऱ्या शेतकऱ्यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी, आम्ही सरकारच्या एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही. आज निर्णय न झाल्यास पेटलेल्या शेतकऱ्यांच्या या वणव्यात सरकार व त्यांचा अहंकार दोन्ही भस्मसात होतील असा इशारा त्यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Vadettiwar: आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांकडून बनवाबनवी: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची टीका; लढा देण्याचा निर्धार

IND vs PAK: अक्षरच्या गोलंदाजीवर मोठा शॉट मारायला गेला पण…; शानदार झेल घेत तिलकने झमानला दाखवला ‘शॉर्टकट टू पॅव्हेलियन’, पाहा व्हिडिओ

Minister Nitin Gadkari: पाणी व्यवस्थापनाने शेतकरी ऊर्जादाता: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी; नाम फाउंडेशन दशकपूर्तीनिमित्त कार्यक्रम

Sharad Pawar: जरांगेंशी आमचा कसलाही संबंध नाही: शरद पवार यांची स्पष्टोक्ती; आरक्षणप्रश्‍नी एकत्रित विचार करण्याचे आवाहन

पोलिस भरती ठरली, पण नव्या पोलिस ठाण्यांचा निर्णय होईना! सोलापुरातील १७ ठाण्यांसह राज्यभरातील शेकडो प्रस्ताव 'गृह'कडे धुळखात; गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याने अंमलदारांवर तपासाचे ओझे

SCROLL FOR NEXT