Regular loan payers and farmers with loans above Rs 2 lakh should repay their loans by June 30 says minister hasan mushrif
Regular loan payers and farmers with loans above Rs 2 lakh should repay their loans by June 30 says minister hasan mushrif 
कोल्हापूर

... फक्त एवढेच शेतकरी ठरणार कर्जमाफीस पात्र ; या आहेत अटी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी व दोन लाखावरवरील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी ३० जूनपर्यंत आपले कर्ज पूर्ण भरावे तरच ते शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्र होतील, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे , महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना आणून राज्यातील ३० लाख १२ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन त्यांच्या जीवनामध्ये आनंद आणला होता. त्यापैकी १९ लाख शेतकऱ्यांना कोणत्याही अटी व शर्तीशिवाय, शेतकरी कुटुंबांना त्रास न देता कर्जमाफीचे शेतकऱ्यांचे कोरोना संकटांच्या आधी १२ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर जमा केले होते. ज्या जिल्ह्यांमध्ये गावा- गावामध्ये सार्वजनिक निवडणुका सुरू होत्या तिथे आचारसंहितेमुळे व तांत्रिक अडचणीमुळे कर्जमाफीची रक्कम जमा करता आली नाही. अशा ११ लाख १२ हजार शेतकऱ्यांना आठ हजार १०० कोटी रुपये अद्याप द्यावयाचे आहेत. कोरोना या विषाणूच्या संकटामुळे सगळे जग संकटात आले असून आर्थिक फार मोठा फटका बसला आहे. आपल्याही राज्याचे आर्थिक स्त्रोत्र आटले असून कालच रिझर्व बँकेचे प्रमुख श्री. शक्तीकांत दास यांनी भारत देशाचा जीडीपी म्हणजेच विकासाचा दर झिरो टक्के राहील, असे जाहीर केल्यावर आमच्यासारख्या लोकांच्या पोटामध्ये गोळा उठला आहे.

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 
तरीसुद्धा; राज्यसरकारने जे शेतकरी कर्जमाफीस पात्र आहेत. परंतु ; पैसे जमा झालेले नाहीत त्यांना या खरीप हंगामामध्ये कर्ज मिळावे म्हणून सर्व बँकांना स्वतःची थकहमी दिली असून शासनाच्या नावे येणे दाखवून शेतकऱ्यांची थकबाकी निरंक करून त्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी हमी घेतली आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जरी नाबार्डने परवानगी दिली नाही तरी आणि एनपीए झाली तरी आमची बँक अशा शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देईल. तसेच सर्व बँकांनी अशाप्रकारे करावे, अशी विनंती आहे.

 तसेच २००९ सालच्या केंद्रसरकारच्या कर्जमाफीत अपात्र झालेल्या शेतकऱ्यांनाही कर्ज देणेबाबत धोरण जाहीर केले होते. परंतु; शेतकऱ्यांनी कर्जमाफीच हवी, कर्ज नको असे धोरण घेतले होते. पुन्हा त्यांना कर्ज देण्याचा प्रयत्न करणार आहे. यासंबंधीही अंतिम सुनावणी सुप्रीम कोर्टात १९ मार्च २०२० रोजी होती परंतु कोरोना संसर्गामुळे ती झाली नाही. ही सुनावणीही लवकरच होऊन तिचा निकालही शेतकर्‍यांच्या बाजूने लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

उर्वरित नियमित कर्ज भरणारे व दोन लाखाच्यावरील कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना मंत्रिमंडळाने यापूर्वीच निर्णय घेतला असून, अर्थसंकल्पीय भाषणामध्ये उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री नामदार अजित पवार यांनी स्पष्ट व ठळकपणे नियमित भरणारे म्हणजे कर्ज भरण्याची मुदत ३० जून २०२० पर्यंत असते त्यांनी, आपल्या घेतलेल्या कर्जाची पूर्णफेड केली तर त्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये व ज्यांची रक्कम दोन लाखांवरीलआहे, त्यांनी वरील रक्कम ३० जूनपर्यंत भरली तर त्यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय जाहीर केला होता. तो सर्व प्रसारमाध्यमांनी टीव्हीवर दाखवला होता आणि वृत्तपत्रांमध्येही छापून आला होता. सामान्यातल्या सामान्य शेतकऱ्यांनाही तो समजला होता व तो ३० जूनपर्यंत कर्ज भागवण्याच्या प्रयत्नामध्ये आहे.

दरम्यान, ३० जूननंतर नियमित कर्ज भरणारे शेतकरी किती? रक्कम किती व दोन लाखावर शेतकरी किती व रक्कम किती याची माहिती घेऊन निधीच्या उपलब्धतेनुसार शासन कर्जमाफी देण्यासाठी बांधील आहे. अर्थचक्र हळू - हळू चालू होत आहे. लवकरात लवकर कोरोना विषाणूवर औषध निर्माण करून मानव कोरोणावर विजय मिळवेल, असा विश्वास आहे. 

हे महाविकास आघाडीचे सरकार आहे. जेवढे करता येईल व शक्य असेल तेवढे जाहीर करते व त्याची अंमलबजावणी करणारे हे शासन आहे.


 कोल्हापूर जिल्ह्याची कर्जमाफी
एकूण ४६ हजार ९७४ शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र. त्यापैकी ३९ हजार , ७० शेतकऱ्यांच्या खात्यांवर २२९ कोटी रुपये जमा झाले आहेत. उर्वरित ७,९०४ शेतकऱ्यांचे अंदाजे ७० कोटी रुपये यावयाचे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT