sagar sadabhau khot comment on agriculture bill 
कोल्हापूर

 सांगलीतील नेर्ले येथे कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ उभारल्या गुड्या 

सकाळ वृत्तसेवा

नेर्ले : केंद्र सरकारच्या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्याला आता पिकविलेल्या मालाला ज्यादा भाव मिळेल. तो कुठेही विकण्याचे स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने त्याला मिळाले. यामुळे शेतकऱ्याच्या पायातील बेड्या काढण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. याचा आनंद व्यक्त करीत येथील शेतकऱ्यांनी शेतकरी गुढी उभारली असल्याचे मत रयत क्रांती संघटनेचे नेते सागर खोत यांनी व्यक्त केले. ते येथील शेतकऱ्यांनी शेतात विधेयकाच्या समर्थनार्थ  गुढ्या उभारल्याप्रसांगी बोलत होते.

माजी सरपंच व रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते लालासाहेब पाटील यांच्या शेतात शेतकरी गुढी उभारली. राज्य प्रवक्ते लालासाहेब पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष सतीश पाटील यांच्या हस्ते सागर खोत यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास तालुकाध्यक्ष लालासाहेब धुमाळ, किरण उथळे, बजरंग भोसले, मोहसीन पटवेकर, संतोष पेटकर, स्वप्निल लोहार, ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील, शरद बल्लाळ, पांडुरंग पाटील,शेतकरी उपस्थित होते.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

Solapur Rain : कोरड्याठक सीना नदीला २५ वर्षांत पहिल्यांदाच भयंकर पूर, १० गावे पाण्याखाली, हजारो नागरिकांचा संपर्क तुटला

Maharashtra Weather Updates : राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, आजही मुंबई-पुणे, मराठवाड्याला धोक्याचा इशारा

Pune Heavy Rain: सहा तालुक्यांत अतिवृष्टी; १७ धरणांतून पाणी सोडले, दौंडमध्ये ढगफुटी

Ujani Dam:'भीमा नदीला तीन महिन्यांत तिसऱ्यांदा पूर'; उजनीतून पाच वर्षांनंतर यंदा सोडले १५२ टीएमसी पाणी, ९० हजार क्युसेकचा विसर्ग

SCROLL FOR NEXT