sarpanch without honor three months 
कोल्हापूर

धक्कादायक ; गावचे कारभारीच आहेत मानधनाविना 

युवराज पाटील

शिरोली पुलाची (कोल्हापूर ) : राज्यातील सरपंचाचे गेल्या तीन महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही.  या थकीत मानधनातूच मुख्यमंत्री निधीसाठी ४० टक्के कपातीची घोषणा सरकारने केली. त्यामुळे उर्वरित मानधन तरी मिळेल का? असा सवाल राज्यातील सरपंचांकडून होत आहे.
 

राज्यात सुमारे २८ ते ३० हजार ग्रामपंचायती आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी तत्कालीन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली होती. गावातील लोकसंख्येच्या आधारावर ही वाढ होती. सरासरी १२०० ते ३००० रुपये असे मानधनवाढीचे स्वरूप होते. मेळाव्यानंतर कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या सरपंचांच्या खात्यात वाढीव मानधन जमा झाले. त्यानंतर पुढचे चार महिने ते मिळालेच नाही. त्यानंतर राज्यात सत्तापालट झाला. सुरुवातीला काही महिने मानधन मिळाल्यानंतर पुन्हा ते थकले. मागील तीन महिन्यांपासून सरपंचांना मानधनाची प्रतीक्षा आहे. 

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, करोनाची साथ आल्यावर राज्य सरकारने लोकप्रतिनिधींच्या मानधनातून ४० टक्के कपातीचा निर्णय घेतला. त्यात सरपंच, उपसरपंचांचाही समावेश आहे. मात्र मागील तीन महिन्यांपासून मानधनच मिळाले नाही. आता ४० टक्के कपात करून तरी उर्वरित मानधन द्या, अशी मागणी सरपंच संघटनांकडून होत आहे.

''मानधन नियमित मिळत नसून, गेल्या तीन महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही.'' 

-शशिकांत खवरे, सरपंच, शिरोली पुलाची.

असे आहे सरपंच, उपसरपंचाचे मानधन 
२००० पर्यंत लोकसंख्या - सरपंच ३ हजार / उपसरपंच - १ हजार  
■ ८००० हजार पर्यंत लोकसंख्या - सरपंच ४ हजार / उपसरपंच - १ हजार ५००  
■ ८ हजारपेक्षा अधिक लोकसंख्या - सरपंच ५ हजार / उपसरपंच - २ हजार
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Athletics: ५८.४५ मीटर लांब थ्रो आणि नवा इतिहास! समीर देशमुखने ७ वर्षांपूर्वीचा 'तो' मोठा रेकॉर्ड मोडीत काढला!

इतकं जीव ओतून काम केलं पण... अपूर्वाने सांगितलं 'रात्रीस खेळ चाले' मालिका सोडण्याचं खरं कारण; म्हणाली, 'खूप वाईट...'

Latest Marathi News Live Update : शेती नुकसानीच्या भरपाईसाठी अकोल्यात प्रहारचे ठिय्या आंदोलन; खत उपलब्धतेचीही मागणी

Maharashtra Sports Policy: महाराष्ट्राच्या क्रीडांगणांवर आता CCTV, चेंजिंग रूम आणि टॉयलेट अनिवार्य! महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय

Kharghar Disabled girl : संतापजनक! नवी मुंबईत 17 वर्षीय दिव्यांग मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार; पीडिता चार महिन्यांची राहिली गर्भवती

SCROLL FOR NEXT