कोल्हापूर

'राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास राज ठाकरे जबाबदार'

'राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी जबाबदार राज ठाकरे असतील'

सुनील पाटील

'राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी जबाबदार राज ठाकरे असतील'

कोल्हापूर : दंगल घडवण्यासाठी चितावणीखोर भाषण केल्याप्रकरणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर कारवाई केली जात आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस राज्यासाठी महत्वाचे आहेत. ठाकरे यांनी पुढी दोन दिवस काय करणार आहे हे जाहीर पणे सांगितले आहे. त्यामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी जबाबदार राज ठाकरे असतील, असा इशारा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज दिला. कदमवाडी येथे महाविकास आघाडीच्या विजयी मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. 

यावेळी सतेज पाटील म्हणाले, राज ठाकरे यांना महाराष्ट्रात बेरोजगारी वाढवायची आहे का? राज्यातील उद्योग बाहेर घालवायचे आहेत का? महाराष्ट्राची प्रगती होवू नये असे त्यांना वाटते का? असा राज्यातील तरुणांना प्रश्‍न पडला आहे. राजकारणाच्या विचाराने राज ठाकरे हे करत आहेत. त्यामुळे 153 कलमाखाली त्यांच्यावर कारवाई होईल. त्यामुळे राज्यातील युवकांनी यामध्ये सहभाग घेवू नये. आपले भविष्य बरबाद करु नये. भडक गोष्टींमागे जावू नये. पोलिसांनी योग्य ती दक्षता घेतली आहे. लोकांची सुरक्षा राज्याच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. सर्व पोलिसांच्या सुट्ट्या आज आणि उद्या रद्द करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र प्रगतशील आणि शांत आहे. तो तसाच राहिला पाहिजे. यासाठी, एसआरपीच्या 87 युनिट कार्यरत आहेत. 30 हजार होमगार्ड आहेत. राज ठाकरे हनुमान चालिसावर ठाम असतील तर आम्ही तसे नियोजन केले आहे. राज्य शासन म्हणून आम्ही कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम केले जात असल्याचेही पाटील यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT