Shiv Sena Melava Kolhapur esakal
कोल्हापूर

Kolhapur : 'बाळासाहेब ठाकरेंनी उभारलेली ही दीवार आहे, छोट्या-मोठ्या धक्क्याने ती कोसळणार नाही'

ज्यांनी धोका दिला आहे, त्यांचा बदला घ्यायचा आहे, यासाठी पक्ष तळागाळात पोहोचवा.

सकाळ डिजिटल टीम

पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर न मांडता ते ‘मातोश्री’च्या दारात सोडवले गेले पाहिजेत. लोकसभेच्या २८८ जागा लढवण्याची तयारी होण्यासारखी बांधणी करा.

कोल्हापूर : ‘ज्यांनी धोका दिला आहे, त्यांचा बदला घ्यायचा आहे, यासाठी पक्ष तळागाळात पोहोचवा. पक्ष बांधणीचे काम मजबूत करा,’ असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर (Arun Dudhwadkar) यांनी येथे केले.

पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये पक्ष पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यास माजी आमदार, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते. मेळाव्यात मशाल पेटवून लोकसभेच्या उमेदवारांना निवडून आणण्याचा निर्धार केला.

दरम्यान, मेळाव्यात सच्च्‍या आणि प्रामाणिक शिवसैनिकालाच उमेदवारी द्या, उसना उमेदवार नको, अशी ही मागणी सर्वांनीच भाषणात केली. याचवेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी थेट कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून तर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली.

दुधवडकर म्हणाले, ‘बाळासाहेब ठाकरे यांनी उभारलेली ही ‘दीवार’ आहे. छोट्या-मोठ्या धक्क्याने ती कोसळणार नाही. लोकसभेसाठी उमेदवारी मागताना आपल्या पायाखाली किती थर मजबूत आहेत, हेसुद्धा पाहायला पाहिजे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद अशा अनेक ठिकाणी पोहोचले पाहिजे. पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर न मांडता ते ‘मातोश्री’च्या दारात सोडवले गेले पाहिजेत. लोकसभेच्या २८८ जागा लढवण्याची तयारी होण्यासारखी बांधणी करा.’

विजय देवणे म्हणाले, ‘उद्धव ठाकरेंनी कधी खुर्चीसाठी राजकारण केले नाही. ज्यावेळी मी लोकसभा लढविली तेव्हा आपल्याकडे एकही आमदार नव्हता. फक्त संजय पवार बरोबर होते. आताची परिस्थिती वेगळी आहे. आता उसना उमेदवार नको. एकेकाळी सहा आमदार, दोन खासदार शिवसेनेचे होते. ते पुन्हा आणायचे आहेत. त्यासाठी लवकरच आम्ही राधानगरीपासून ‘मिशन २०२४’ हाती घेणार आहोत.’

माजी आमदार उल्हास पाटील म्हणाले, ‘मतदार संधीची वाट पाहत आहेत. स्वाभिमानाने जनतेसमोर जायचे आहे. येणारा काळ अडचणीचा आहे; पण कठीण नाही. यासाठी सच्चा शिवसैनिकांनाच उमेदवारी मिळाली पाहिजे, असा अहवाल मातोश्रीवर पोहोचवावा.’

माजी आमदार सत्यजित पाटील यांनी नेमका मेळावा कशासाठी आहे, हेच सांगण्यात आले नसल्याची खंत व्यक्त केली. ते म्हणाले, ‘लोकसभेसाठी जो उमेदवार द्याल, त्याला शाहूवाडी, आंबा परिसरातून मताधिक्य देऊ.’ माजी आमदार सुजित मिणचेकर म्हणाले, ‘भाजप घराघरांत भांडणे लावत आहे. सुरुवातीला शिवसेना फोडली, आता राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. भाजपची ही रणनीती मतदारांसमोर आणली पाहिजे.’

मुरलीधर जाधव म्हणाले, ‘काहीजण निवडणुकीवेळी पक्षात येऊन खासदार झाले. आता हे चालणार नाही. आता उसना उमेदवार खपवून घेणार नाही.’ यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, सांगलीचे जिल्हाप्रमुख अविनाश पाटील यांच्यासह माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, नियाज खान, विशाल देवकुळे, मंजित माने, हर्षल सुर्वे, दीप्ती कोळेकर, स्मिता सावंत, प्रकाश पाटील, सुप्रिया पाटील, अवधूत साळोखे, प्रभाकर खांडेकर, विराज पाटील, तानाजी आंग्रे, दीपाली शिंदे, दीपक गौड आदी उपस्थित होते.

shiv sena melava Kolhapur

पक्षांतर केलेल्यांचा समाचार

‘ज्यांना खुर्चीला खुर्ची लावून बसविले त्यांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे. ही शिवसेना ठाकरेंची आहे. कुठेही कमी पडणार नाही. खुर्चीला खुर्ची लावून बसणारे बाहेर पडले असले तरी समोर बसणारे मतदार आपल्याला निवडून दिलेलेच आहेत, हे विसरून चालणार नाही’, अशा शब्दांत माजी आमदार सत्यजित पाटील यांनी शिवसेनेतून पक्षांतर केलेल्यांचा समाचार घेतला.

राजघराण्याचा आदर करावा...

शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी आमदार मालोजीराजे यांच्यावर टीका केली. त्यावर दुधवडकर यांनी राजघराणे हे राजर्षी शाहू छत्रपतींचे वंशज आहेत, त्यांचा आम्ही आदर करतो आणि इतरांनीही आदर करावा, असे सुनावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT