कोल्हापूर

सहा जिल्ह्यांत मिळणार कामगारांना मोफत भोजन; कामगार मंत्र्यांची घोषणा

सकाळ वृृत्तसेवा

कोल्हापूर : ‘‘राज्याच्या विकासात कामगारांचे योगदान मोठे आणि महत्त्वपूर्ण आहे. ते राज्याच्या विकासाचे प्रमुख आधारस्तंभ आहेत’’, असे गौरवोद्गार राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल काढले. महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राज्यात मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नागपूर येथे बांधकाम कामगारांना त्यांच्या ठिकाणी माध्यान्ह व रात्रीचे भोजन मोफत देण्यात येईल, तसेच भविष्यात अन्य जिल्ह्यांचाही यामध्ये समावेश करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

कामगार दिनाच्या शुभेच्छा देताना मुश्रीफ यांनी कामगारांची सुरक्षितता, आरोग्य, कल्याणकारी योजना, कोरोना स्थिती आदी मुद्यांना स्पर्श केला. ‘‘वर्षभराहून अधिक काळ सर्व जण कोरोनाविरोधात एकजुटीने लढत आहोत. रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी राज्यात १५ मेपर्यंत कडक संचारबंदी लागू केली आहे. निर्बंध जाहीर करतानाच राज्य शासनाने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी मदत जाहीर केली. ती कामगारांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे,’’ असे त्यांनी नमूद केले.

ते म्हणाले, की महाराष्ट्राच्या जडणघडणीत कामगारांचे अनन्यासाधारण महत्त्व आहे. राज्य शासन कामगारांच्या सुरक्षेला, आरोग्याला व विकासाला प्राधान्य देतानाच कामगारांच्या हिताचे कायदे राबवित आहे. कामगारांचे हक्क व हित नेहमी अबाधित ठेवू. उद्योग, कामगार आणि कौशल्य विकास विभाग एकत्रित आल्याने महाराष्ट्राची घोडदौड नक्कीच होईल. महाविकास आघाडीचे सरकार नेहमी कामगार वर्गाच्या पाठीशी उभे राहील.

राज्य शासनाच्या प्रयत्नांची माहिती देताना ते म्हणाले, ‘‘निर्बंधांच्या काळात आर्थिक दुर्बल घटकांना त्रास होऊ नये, यासाठी १ हजार ७७६ कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. नोंदणीकृत बांधकाम कामगार कल्याण योजनेंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाच्या निधीमधून राज्यातील नोंदणीकृत अशा सुमारे १३ लाख बांधकाम व २३ लाख घरेलू कामगारांसाठी प्रत्येकी १५०० रुपये देण्यात येतील. बारा लाख रिक्षाचालकांनाही प्रत्येकी १५०० रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. कामगार संघटनांनी कोविड विरोधी लढाईत राज्य शासनाला सहकार्य करावे.''

मुश्रीफ म्हणाले...

महाराष्ट्र अनेक कामगार कायद्यांचे जनक आहे.

राज्यातील १३ लाख बांधकाम कामगारांपैकी २ लाख १७ हजार नोंदणीकृत बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य.

४ दिवसांत १३७.५ कोटी निधी थेट बांधकाम मजुरांच्या खात्यात.

महाराष्ट्राच्या जडणघडणीत शेतकरी, कामगारांचा वाटा मोठा.

कामगार वर्गाची काळजी घेण्यास शासन समर्थ.

Edited By- Archana Banage

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

International Firefighters' Day 2024: एक दिवस खऱ्या सुपरहीरोंसाठी! आज साजरा केला जातो 'फायर फायटर डे'; कशी झाली सुरूवात?

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

SCROLL FOR NEXT