Stopping of vehicles other than essential services from Maharashtra to Karnataka 
कोल्हापूर

महाराष्ट्रातून कर्नाटकात जाताय तर वाचा...

अनिल पाटील

कोगनोळी (बेळगाव) - महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या अत्यावश्यक सेवा वगळता अन्य वाहने सोडणे बंद केले आहेत. अजमेरहून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट होताच कोगनोळी सीमा नाक्यावर बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणे अवघड झाले आहे.
सीमेलगतच असणाऱ्या महाराष्ट्रातील गडहिंग्लज, चंदगड, आजरा, उत्तूर यासह महाराष्ट्रातील अन्य भागात जाणाऱ्या अत्यावश्यक सेवा वगळता अन्य वाहनांना परत पाठवण्यात येत आहे. त्यामुळे या भागात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

सीमाभागातील लोक महाराष्ट्रात गेले असता कोणत्या कारणाने गेले, अत्यावश्यक कारणाने गेले असतील तर त्यांना परत कर्नाटकात घेण्यात येत आहे.
या कर्नाटक-महाराष्ट्र पोलिस सीमा तपासणी नाक्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील लोकांना मोठी अडचण निर्माण होत आहे.

रोज २५० ते ३०० वाहने परत

महाराष्ट्रातून कर्नाटकमार्गे महाराष्ट्रात जाण्यासाठी अनेक वाहने कोगनोळी तपासणी नाक्यावर येत आहेत. त्यातील अत्यावश्यक सेवा वगळता रोज २५० ते ३०० वाहने कर्नाटक पोलिसांकडून परत पाठवण्यात येत आहेत.
 

'कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोगनोळी नाक्यावर बंदोबस्त कडक केला आहे. येथून केवळ अत्यावश्यक सेवेसाठी वाहने सोडण्यात येत आहेत.'
- बी. एस. तळवार,
उपनिरीक्षक, निपाणी ग्रामीण पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT