कोल्हापूर

पाण्यासाठी एकाच पंपाचा आधार

CD

पाण्यासाठी एकाच पंपाचा आधार
---
कट्टीमोळा उपसा पंप बंद; इचलकरंजीत पंचगंगा पाणीपातळीत आणखी घट
इचलकरंजी, ता. २४ ः पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी खालावत चालल्याने कट्टीमोळा डोहातून आज पाणी उपसा बंद केला. त्यामुळे सध्या पंचगंगा योजनेतून केवळ २५० एचपीचा एकच पंप सध्या सुरू आहे. त्यामुळे अत्यंत अपुरे पाणी उपलब्ध होत असून, त्यातूनच शहरवासीयांची तहान भागविण्याचे प्रयत्न महापालिका प्रशासनाकडून सुरू आहेत.
कृष्णा योजनेची शिरढोण परिसरातील जलवाहिनी बदलण्याचे काम आजही सुरू होते. उद्या (ता. २५) सायंकाळी हे काम पूर्णत्वास जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर किमान २४ तास नवीन जलवाहिनीच्या ठिकाणी टाकलेले काँक्रीट वाळण्यासाठी द्यावे लागणार आहे. परिणामी, येत्या सोमवार (ता. २७)पासून कृष्णा नदीतून पाणी उपसा सुरू केला जाईल. त्यानंतर जलवाहिनी टाकलेल्या ठिकाणी पुन्हा गळती लागली नाही, तर पुढे सलग उपसा केला जाणार आहे. त्यानंतर तीन ते चार दिवसांनी शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास सुरुवात होईल.
दुसरीकडे, पंचगंगा नदीची पाणीपातळी कमी होत आहे. त्यामुळे पंचगंगा योजनेचा १०० एचपीचा उपसा पंप यापूर्वीच बंद पडला. कट्टीमोळा डोहातील २५० एचपीचा सबमर्सिबल पंपही आजपासून बंद ठेवण्यात आला. त्यामुळे केवळ पंचगंगा योजनेतून पाणी उपसा सुरू आहे. यातून केवळ आठ एमएलडीइतके पाणी उपलब्ध होत आहे. रोजची गरज ५४ एमएलडीइतकी आहे. त्यामुळे प्रचंड पाण्याची तूट निर्माण झाल्याने शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. सध्या शहरात आठवड्यातून एकदाच पाणी येते. त्यामुळे नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
-----------------
पंचगंगा नदीच्या पाण्याबाबत दक्षता
सध्या पंचगंगा नदीतील पाण्याचा प्रवाह थांबला आहे. त्यामुळे पाणीप्रदूषणाचा धोका निर्माण झाला. परिणामी, खबरदारी म्हणून पंचगंगा नदीतील पाणी पिण्यायोग्य असल्याची खात्री प्रशासनाकडून केली जात आहे. सध्या तरी पाणी पिण्यासाठी धोकादायक नसल्याचा निर्वाळा प्रशासनाकडून देण्यात आला. त्यासाठी आवश्यक ती तपासणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
-----------
नवीन पाच जलकुंभांना मंजुरी ः आमदार आवाडे
इचलकरंजी शहरात विविध पाच ठिकाणी नवीन जलकुंभ उभारणीसाठी केलेल्या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास बाब म्हणून वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून १५ कोटींचा निधी देण्यास तत्त्वतः मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव तातडीने पाठविण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला दिला. याबाबतची माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली. शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून शहरात पि. बा. पाटील मळा, जुना चंदूर रोड (दुर्गामाता मंदिर मागे), यशवंत कॉलनी, तुळजाभवानी नगर (शहापूर) आणि बाळकृष्ण बुवा विद्यामंदिर, जवाहरनगर येथे जलकुंभ उभारणीसह तत्सम कामांसाठी १५ कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार आवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT