कोल्हापूर

संवाद-समन्वयातून मिळाला २२० ग्राहकांना न्याय

CD

लोगो- जागतिक ग्राहक दिन

ग्राहक चळवळीने दिला
२२० जणांना न्याय

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ ः बाजारपेठेतील तीव्र स्पर्धा, महागाई, जागतिकीकरणाबरोबरच फसवणुकीचे प्रमाणही वाढले आहे. जिल्ह्यात वर्षभरात फसवणूक, अन्यायाविरोधात संवाद आणि समन्वयाच्या माध्यमातून ग्राहक चळवळीने देऊन २२० ग्राहकांना न्याय मिळवून दिला. अखिल भारतीय ग्राहक पंचायत कोल्हापूर महानगरने ही कामगिरी केली.
‘ग्राहक पंचायती’ची शहरात शिवाजी पेठ, सानेगुरुजी वसाहत, राजारामपुरी, कसबा बावडा येथे मार्गदर्शन केंद्रे आहेत. त्यांच्या माध्यमातून जानेवारी २०२२ ते फेब्रुवारी २०२३ अखेरपर्यंत एकूण २६५ जागरुक ग्राहकांच्या विविध स्वरूपातील तक्रारी दाखल झाल्या. त्यात विम्याची रक्कम उशिरा मिळणे, रेल्वे-एसटी-विमानाच्या तिकीट नोंदणी रद्दनंतर कमी आणि विलंबाने रक्कम मिळणे, फ्लॅटचा ताबा मिळाला नसणे, शाळेचे शुल्क भरूनही प्रवेश निश्‍चितीबाबत टाळाटाळ करणे आदी तक्रारींचा समावेश होता. त्यावर ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी या तक्रारींची पडताळणी करून संवाद, समन्यवातून २२० ग्राहकांच्या तक्रारींचे निराकारण केले. उर्वरित तक्रारी आयोगाकडे पाठविल्या.

चौकट
ग्राहकांनी काय करावे?
-खरेदी केलेल्या वस्तूत दोष आढळल्यास ती बदलून मागावी
-वस्तू किंवा सेवा यांचे मूल्य ५० रुपयांपेक्षा अधिक असल्याची त्याची पावती घ्यावी
-गॅरंटी, वॉरंटी यातील फरक समजून घेऊन त्याबाबतचे कार्ड तपशीलासह घ्यावे
-दर्जा पाहूनच वस्तूंची खरेदी करावी
-सार्वजनिक सेवा देणाऱ्या आस्थपनांमधील ग्राहक तक्रार नोंदवहीचा वापर करावा.

चौकट
सजग, जागरुक रहावे
ग्राहकांनी वस्तू खरेदी अथवा सेवेचे शुल्क आदा करताना सजग, जागरूक रहावे. कोणत्याही दबावाखाली पाऊल टाकू नये. ग्राहक संरक्षण कायदा २०१९ नुसार मिळालेले सुरक्षितता, माहिती मिळविणे, वस्तू निवडणे, तक्रार निवारण, ग्राहक शिक्षण, आरोग्यदायी पर्यावरण या अधिकारांचा वापर करावा. अन्याय, फसवणुकीविरोधात ग्राहक पंचायत, तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायत कोल्हापूर महानगरचे अध्यक्ष कमलाकर बुरांडे यांनी आज केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वनतारा'मध्ये घेऊन गेलेल्या 'महादेवी'ला परत आणण्यासाठी ताकदीने लढा; मुनिश्री आदित्यसागर यांचे राजू शेट्टी, प्रतीक पाटलांना आवाहन

Explained: तुम्हालाही जास्त अक्रोड खाण्याची सवय आहे का? मग होऊ शकतात 'हे' दुष्परिणाम

मुंबईत मुसळधार! ट्रॅकवर पाणी, लोकल ट्रेनचं वेळापत्रक कोलमडलं; अनेक भागात साचलं पाणी

Latest Marathi News Updates : मराठा समाजानंतर आता बंजारा समाज आरक्षणासाठी आक्रमक; बीडमध्ये आज विराट मोर्चा

Showroom fire: 'साेलापूरातील सिद्धी सुझुकी अन्‌ बजाज शोरूमला भीषण आग'; धूर पाहून वॉचमनने दाखविली तत्परता, अंदाजे ३५ ते ४० लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT