कोल्हापूर

फसवणूक टाळण्यासाठी आर्थिक साक्षरता महत्‍वाची

CD

05927

फसवणूक टाळण्यासाठी आर्थिक
साक्षरता महत्‍वाची ःप्रा. ककडे

कोल्हापूर, ता. ३० ः सध्याच्या धावपळीच्या जीवनात नागरिकांची आर्थिक फसवणूक होत आहे. ती टाळण्यासाठी आर्थिक साक्षरता महत्वाची आहे, असे मत अर्थशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. विजय ककडे यांनी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रात अर्थशास्त्र विभागातर्फे मंगळवारी अर्थ साक्षरता उपक्रमाअंतर्गत आयोजित ‘वित्तीय साक्षरता व स्वेच्छा निवृत्ती’ याविषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संचालक प्रा. डी. के. मोरे होते. प्रा. ककडे म्हणाले, ‘आजच्या काळात आर्थिक निरक्षरतेमुळे नागरिकांची आर्थिक फसवणूक वाढली आहे. शिक्षण, पर्यावरण, संगणक आणि मोबाईल साक्षरता यापेक्षाही आर्थिक साक्षरता महत्वाची आहे. आर्थिक संपत्ती मिळविणे, त्याचा संचय करणे व ती वाढविणे हा प्रत्येकाचा उद्देश असतो. मिळालेल्या संपत्तीचा कसा विनियोग केला याचा हिशोब महत्वाचा आहे.’ आर्थिक प्रवर्तक अनिल पाटील म्हणाले, ‘कोणतीही आर्थिक गुंतवणूक करताना आर्थिक सल्ला घेणे महत्वाचे आहे. भविष्यातील आर्थिक गुंतवणूकीसाठी आर्थिक सल्लागाराची भूमिका महत्वाची आहे. विविध कंपन्याचे शेअर्स घेताना कंपन्याचा भूतकाळ व भविष्य काळाचा अभ्यास करून शेअर्स खरेदी करावे.’ प्रा. मोरे म्हणाले, ‘प्रत्येकांनी आर्थिक नियोजन केल्यास आपला व कुटुंबाचा भविष्यकाळ चांगला असेल.’ समन्वयक डॉ. के. बी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. पी. पी. दावणे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. डॉ. पी. एन. देवळी यांनी सूत्रसंचालन केले. डी. के. कमलाकर यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं; पंतप्रधान नरेंद्र मोदी माळशिरसमधून लाईव्ह

Gharoghari Matichya Chuli: ऐश्वर्याने केलं सौमित्रला किडनॅप; 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत नवा ट्विस्ट

Kalsubai Peak : आनंद महिंद्रांना देखील भावतोय महाराष्ट्राचा माऊंट एव्हरेस्ट, कळसूबाई शिखराला कशी भेट द्यायची ?

T20 WC 24 Team India : भारतासाठी T20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूचा संघातून पत्ता कट?, जाणून घ्या कारण

Raghuram Rajan: भारताचा वास्तविक विकास दर 8 ते 8.5 टक्के नाही तर...; रघुराम राजन यांनी दाखवले अर्थव्यवस्थेचे दोन चेहरे

SCROLL FOR NEXT