Urea will now be supplied to farmers 
कोल्हापूर

आता शेतकऱ्याच्या बांधावर होणार युरियाचा पुरवठा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : शासनाने जिल्हा परिषद कृषी विभागाला 2020/21 सालासाठी 1 हजार मेट्रिक टन युरिया खताचा बफर स्टॉक मंजूर केला आहे. त्यापैकी जिल्ह्यासाठी 108 मेट्रिक टन युरिया खताचा बफर स्टॉक मंजूर केला आहे. जर शेतकऱ्यांनी एकत्रित येवून गटाने मागणी केली तर त्यांच्या बांधावर हे खत पोहोच केले जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी दिली. कृषी समितीच्या बैठकीनंतर ते बोलत होते. 

श्री.पाटील म्हणाले, सतत युरियाच्या टंचाईच्या तक्रारी येतात. त्यावर तोडगा काढण्यासाठी शेतकऱ्याला बांधावरच खत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ यांच्याकडे 108 मेट्रिक टन साठ उपलब्ध झाला आहे. हे खत थेट बांधावर उपब्ध होण्यासाठी शेतकऱ्यांनी एक गट तयार करावा. तसेच आपले नाव, फोन नंबर व मागणी पत्र तयार करुन प्रती युरिया बॅगसाठी 266 रुपये 50 पैसे प्रमाणे रक्‍कम जमा करुन कृषी उद्योग विकास मंडळाकडे भरणा करावी. शेतकरी गटांनी कमीत कमी 10 टन खताची मागणी कृषी सहाय्यक यांच्या मार्फत कृषी विकास अधिकारी तसेच जिल्हा कृषी अधिक्षक़ यांच्याकडे करावी, असे आवाहन श्री.पाटील यांनी यावेळी केले. 

आज झालेल्या कृषी समितीच्या बैठकी सदस्य मनोज फराकटे, शंकर पाटील, हेमंत कोलेकर, कल्पना चौगले, करवीर पंचायत समिती सभापती अश्‍विनी धोत्रे व जिल्हा कृषी अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी उपस्थित होते. या सर्वच सदस्यांनी बांधावर युरिया देण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute : दोन्ही गटांना नवे नाव, चिन्हे का दिली नाहीत? शिवसेना पक्षाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

India ODI Squad : भारताच्या वनडे संघात Rishabh Pant ला का मिळाली नाही संधी? ही असू शकतात ३ महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Update : मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच म्हणाले...

Gokul Milk Union : गोकुळमधील अवसायनातील संस्थांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळली; ४९२ संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम

‘देवमाणूस’नंतर किरण गायकवाडची नवी इनिंग; राजकारण अन् गुन्हा… ‘एफआयआर नं. ४६९’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार?

SCROLL FOR NEXT