woman who was comforted, she went corona 
कोल्हापूर

ज्या महिलेचे सांत्वन केले, तिच निघाली कोरोना पॉझिटिव्ह

नामदेव माने

कसबा बीड : मैत्रीणीच्या पतीचे निधन झाले म्हणून सांत्वन करावयास गेलेल्या 19 महिलांना क्वारंटाईन होण्याची वेळ आली. त्या मधील एका महिलेची धाप वाढल्यामुळे गावात भितीचे वातावरण पसरले आहे. ही घटना कांचनवाडी (ता. करवीर) येथे घडली. 
चार दिवसापुर्वी चाफोडी (ता. करवीर) येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या व्यक्तीच्या पत्नीचे कांचनवाडी व चाफोडीत सलोख्याचे संबंध आहेत.

शेतातील भांगलणी (खुरपणी) पासून छोट्या-मोठ्या कामासाठी ही महिला कांचनवाडी येथे कामासाठी जात होती. त्यामुळे सलोख्याचे संबंध निर्माण झाले होते. ग्रामीण भागात गावात कोणाचाही मृत्यू झाला की त्यांच्या नातेवाईकांना बोलवायला (सांत्वन करायला) महिला बहुसंख्येने जात असतात. 

पण ज्या महिलेचे सांत्वन करण्यासाठी या महिला गेल्या होत्या. त्या महिलेलाच कोरोना झाल्याचा अहवाल गावात पोहचला आणि सर्व महिलांची पाचावर धारण बसली. ही बाब आरोग्य यंत्रणेच्या लक्षात येताच तातडीने या महिलांना त्याच्या घरातून थेट कोरोना कक्षात विलगिकरण करण्यात आले. आणि संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. 

ग्रामीण भागात अंत्ययात्रेला, रक्षाविसर्जनला जास्त गर्दी करणे म्हणजे प्रतिष्ठा समजले जाते. ग्रामीण अशा भागात रूढी परंपरा पाळल्या जातात. पण सध्याच्या कोरोना संसर्ग वाढत आहे. सर्वच पातळीवर सोशल डिस्टन्सिंगसह दक्षता घेतली जात आहे. अशात शासकीय यंत्रणेवरही प्रचंड ताण आहे. त्यामुळे फोनवरूनच सांत्वन करणे हिताचे आहे. गर्दी करू नका. ही जबाबदारी गावातील प्रतिष्ठित लोकांनी घेऊन गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न करायला हवेत 
- डॉ. मधुरा मोरे, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, शिरोली दुमाला. 

(संपादन : प्रफुल्ल सुतार) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT