पश्चिम महाराष्ट्र

वसंतदादांच्या अखेरच्या आठवणी "या' शहराशी निगडीत 

विजयकुमार सोनवणे

सोलापूर ः माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी समाजहिताला प्राधान्य दिले. महाराष्ट्राला सर्वच क्षेत्रांत आघाडीवर नेण्याचे काम केले. शेवटपर्यंत समाजहिताला प्राधान्य दिले. सामाजिक विचाराचे नेते असलेल्या वसंतदादांना महाराष्ट्राच्या राजकारणातील संत म्हणता येईल. त्यांच्या जीवनातील अखेरच्या आठवणी या सोलापूरशी निगडित होत्या. दादांच्या आज (बुधवारी) 102 वी जयंती आहे. त्यानिमित्त माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी जागवलेल्या या आठवणी. 

महाराष्ट्रात दादांनी शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केली. ग्रामीण भागातील मुलेही वकील, डॉक्‍टर व इंजिनिअर झाली पाहिजेत असे त्यांना वाटायचे. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी पाठपुरावा केला. पाणी अडवा आणि पाणी जिरवा, ही योजना त्यांनी त्या वेळी महाराष्ट्रात सुरू केली. दादांनी घेतलेले हे दोन महत्त्वाचे निर्णय महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारे होते. वसंतदादा त्यांच्या आयुष्याच्या शेवटी शेवटी सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. सोलापुरातले त्यांचे कार्यक्रम झाले आणि त्यानंतर ते येथेच आजारी पडले. शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. त्यानंतर मीच त्यांना बॉम्बे हॉस्पिटलला घेऊन गेलो. तीन दिवसांनंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे अखेरच्या दिवसांतील त्यांची सोलापूरला झालेली भेट सर्वांच्याच स्मरणात राहिली, असे श्री. शिंदे यांनी सांगितले. 

श्री. शिंदे म्हणाले, ""1977 मध्ये शरद पवार यांना पाठिंबा देत वसंतदादा आणि नासिकराव तिरपुडे यांचे संयुक्त सरकार पाडण्याच्या मोहिमेत मी सामील झालो. दादांचे मंत्रिमंडळ आम्ही खाली खेचले. त्यानंतर पवार मुख्यमंत्री झाले. बाबासाहेब भोसलेनंतर दादा 1983 मध्ये पुन्हा मुख्यमंत्री झाले. त्यांचे सरकार पाडण्यासाठी मी घेतलेली भूमिका पाहता, दादा मला मंत्रिमंडळात स्थान देतील यावर माझ्यासह कोणाचाही विश्‍वास नव्हता. मात्र दादांनी सर्वांचाच अंदाज चुकवीत मला मंत्रिमंडळात स्थान दिले, इतकेच नव्हे तर मी अर्थमंत्री व्हावे असा आग्रह त्यांनी धरला व तो पूर्णत्वालाही नेला. पूर्वीचा राग न धरता सर्वकाही विसरून त्यांनी मला मंत्रिमंडळात स्थान दिले, याचे मलाही आश्‍चर्य वाटले. त्यांनी मला बोलावून सांगितले, ""सुशील, तू इंदिरा गांधींच्या विरोधात नव्हतास. तू तुझ्या मित्राच्या प्रेमापोटी त्यांच्यासोबत गेलास. त्यामुळे तू या सरकारमध्ये आले पाहिजे.'' असा उदारमतवादी भूमिका असणारा त्यांच्यासारखा दिलदार नेता होणे नाही.'' 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

Australia Squad T20 WC 24 : ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा! ODI वर्ल्डकप जिंकवणाऱ्या पॅट कमिन्सऐवजी 'या' खेळाडूकडे कर्णधारपदाची माळ

'..तर तुम्हाला महाराष्ट्रात येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही'; मनोज जरांगे-पाटलांचा थेट कर्नाटक सरकारला इशारा

Manipur : मणिपूरमधील 'त्या' महिलांना पोलिसांनीच केलं जमावाच्या स्वाधीन; CBI चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT