rain sakal
पश्चिम महाराष्ट्र

मिरज : गणेश तलावाला हवा ‘ऑक्सिजन’

मिरजेतील गणेश विसर्जन मिरवणुकीला मोठी परंपरा आहे

सकाळ वृत्तसेवा

मिरज : जिल्ह्यातील सर्वांत मोठी, ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणूक मिरजेत थाटात पार पडली. यंदा निर्बंधमुक्त उत्साह दिसला. गणेश तलावात १७८ मोठ्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. आता या तलावाचे आरोग्य जपायला हवे. तलावातील जीव जपायला हवेत. त्यात मिरजकरांनी पुढाकार घेतला पाहिजे. महापालिकेला जागं केलं पाहिजे; अन्यथा मिरजेतील रस्ते व विकासाचा जसा खेळखंडोबा झाला आहे, तशीच अवस्था गणेश तलावाची होऊ शकते.

मिरजेतील गणेश विसर्जन मिरवणुकीला मोठी परंपरा आहे. गणेश तलावाच्या दिशेने जाणाऱ्या भव्य मिरवणुका पाहण्यासाठी जिल्ह्यातून लोक येतात. आता तलावात विसर्जनासाठी आधुनिक व्यवस्थाही उभारण्यात आली आहे. गरज आहे ती विसर्जन सोहळ्यानंतर तलावाचे आरोग्य जपण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची. गणेश तलाव मिरजेची संपत्ती आहे. त्या तलावाची अवस्था जर काळ्या खणीसारखी व्हायची नसेल तर दरवर्षी तलाव स्वच्छता, पाणी शुद्धीकरण व कमीत कमी प्रदूषण यासाठी मिरजकरांचा आग्रह आणि महापालिकेचा प्रयत्न असला पाहिजे. तलावात वर्षानुवर्षे प्लास्टर ऑफ पॅरिस साठून राहणे घातक आहे. विसर्जनानंतर काही काळाने ती बाजूला काढणे शक्य होईल का, यावर काम व्हायला हवे. याआधी २००९-१० साली गाळ उपसा केला होता. सध्या दहा वर्षांचे प्लास्टर तळाशी आहे.

सव्वादोनशे वर्षांचा जुना तलाव...

मिरजेला पाण्याचे दुर्भिक्ष्य प्रचंड होते. घरोघरी आड होते. नदी तीन किलोमीटर दूर. त्यामुळे गावातील विहीर, आडांना झरे मिळावेत म्हणून तलाव काढायचे ठरले. निमजच्या माळावरून येणारे लोंढे येऊन ते तलावाला मिळायचे. तलावातून दगड काढून कृष्णाघाट व माधवजी मंदिर बांधकामासाठी ते वापरले. तलावाचे काम १७८५ नंतर सुरू झाले. १८०० साली पाणी पूजन झाले. त्याच्या समोरच गणेश मंदिर बांधले गेले आणि त्याला गणेश तलाव असे नाव पडले, असे इतिहास अभ्यासक मानसिंग कुमठेकर यांनी सांगितले.

कासव, मासे जीव गमावतात...

गणेश तलावात दरवर्षी उत्सवानंतर मासे आणि कासव मेल्याचे आढळून येते. या जीवांचे ते घर आहे. ते पाण्याची शुद्धता राखण्याचेही काम करतात. पाण्यातील अनावश्‍यक वनस्पती, मृत जीव खातात. तेच मरायला लागले तर पाण्याचे प्रदूषण वाढणारच आहे. हे जीव वाचले पाहिजेत, यासाठी कमीत कमी रसायन व जीवांना त्रास होईल, अशा वस्तूच तलावात न जातील, याची खबरदारी घेण्याची गरज आहे.

रसायनयुक्त रंग, तेलाचे तवंग पाण्यावर...

गणेश विसर्जन सोहळ्यानंतर गणेश तलावाच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. बाप्पांना निरोप दिल्यानंतर रसायनयुक्त रंग, तेल आदीचे तवंग पाण्यात येतात. ते घातक आहेत. ते काढता येतील किंवा त्यापासून होणारी हानी टाळता येईल, अशी व्यवस्था केली पाहिजे. या काळात अधिकाधिक ऑक्सिजन प्रवाहित कसे राहील, याबाबत उपाययोजना केल्या पाहिजेत.

नैसर्गिक रंग वापराची सक्ती हवी...

गणेशोत्सव हा भावनिक सण आहे. तो परंपरेप्रमाणे साजरा करताना भावनांना धक्का न लावता काही बदल करता येतील का, यावर बारकाईने काम करण्याची गरज आहे. त्यात विशेषतः मूर्तीला दिला जाणारा रंग हा रसायनमुक्त व निसर्गपूरक असेल तर पाण्याचे प्रदूषण कमी होईल. त्याबाबत सरकारने थोडी सक्तीची भूमिका घ्यायला हवी. असे रंग प्राधान्याने वापरून मूर्तिकारांनीही त्यात आपला वाटा उचलायला हवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live: नाद करा, पण अजिंक्यचा कुठे! हार्दिकला हाणले सलग २ खणखणीत षटकार, रहाणेचे वादळी अर्धशतक Video पाहाच...

एकला चलो रे! काँग्रेसची बंगालमध्ये २९४ पैकी २८४ जागांवर उमेदवारांची घोषणा, यादी आली समोर

इराणवर अण्वस्त्र हल्ला झाल्यास भारतावर परिणाम होईल का? कोणत्या देशांना सर्वाधिक धोका?

Baramati SDM Transfer: बारामतीचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांची बदली; मिरजचे उत्तम दिघे तात्काळ कार्यभार स्वीकारणार

Raigad Pali Road Hazard: पालीतील हटाळेश्वर चौकात प्रचंड खड्डा; भाविक-स्थानिकांचा नगरपंचायतीवर संताप, अपघातांचा धोका वाढला

SCROLL FOR NEXT