sangli
sangli esakal
पश्चिम महाराष्ट्र

तुम्ही राजीनामा द्या, आमदार राष्ट्रवादीचा करु; सेना नेत्याला टोला

सकाळ डिजिटल टीम

'अहंकाराची भाषा शोभत नाही, एवढेच वाटत असेल तर राजीनामा द्या, निवडणुकीला सामोरे जा'

विटा : ‘‘खानापूर मतदार संघातील सर्व पाणी योजना मीच आणल्या, मी सर्व काम केले, माझ्यामुळे झाले, माझे श्रेय आहे. हा ‘मी’पणा आमदार करीत आहेत, ते योग्य नाही. संपतराव अण्णा, नागनाथअण्णांसह परिसरातील अनेक लोकप्रतिनिधींपासून सामान्य शेतकऱ्यांपर्यंत अनेकांचे योगदान पाणी योजनेसाठी आहे. मोठेपणा दाखवून आमदारांनी मान्य करायला पाहिजे. श्रेय घ्यायचेच तर एवढा वेळ का लागला? महत्त्वाच्या ‘बंद’ संस्थांचीही जबाबदारी घ्यावी. ‘चांगलं झालं तर माझं...’ हे योग्य नाही. ‘सत्तेची खुमखुमी येऊ देऊ नका,’ असे तुम्हीच सांगता. आता हे बोलणे काय दर्शवते? अहंकाराची भाषा शोभत नाही. एवढेच वाटत असेल तर राजीनामा द्या, निवडणुकीला सामोरे जा; मग बघा राष्ट्रवादीचा आमदार होतो की नाही ते,’’ असा पलटवार राष्ट्रवादीचे नेते ॲड. वैभव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. बाबासाहेब मुळीक, सुशांत देवकर, तालुका उपाध्यक्ष सचिन शिंदे, शहराध्यक्ष अविनाश चोथे, ऐनवाडीच्या सरपंच सजाबाई तुपे यांची उपस्थिती होती. ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या आघाडी शासनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महत्त्वाचा घटक आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी खानापूर विधानसभा मतदारसंघातील वंचित गावांच्या शेती-पाण्याचा प्रश्न जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे वारंवार मांडला, आग्रह धरला. त्याला त्यांनी विनाविलंब प्रतिसाद देत निर्णय घेतला. टेंभूच्या ६ अ व ६ ब या टप्प्यांना मंजुरी दिली. त्याचा आनंद आम्ही साजरा केला. पेढे वाटले, फटाके वाजवले, तर पोटशूळ का, हे खानापूरच्या जनतेला समजले नाही.’’

‘‘राष्ट्रवादीचा आमदार २०१९ लाच केला असता. तुम्ही वरिष्ठ पातळीवरून राजकीय दबाव आणला व निवडणूक जिंकलीत. आमदारकीचा एवढा गर्व अन् अहंकार असेल तर द्या राजीनामा अन् या मैदानात. आम्हीही तयार आहोत, ठरवू द्या लोकांना,’’ असे आव्हान ॲड. पाटील यांनी दिले. ते म्हणाले, ‘‘जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत बिनविरोध निवडून दिले, हे विसरू नका. विटा नगरपरिषदेत तुम्ही वारंवार करीत असलेला हस्तक्षेप, अधिकाऱ्यांना दमदाटी व कार्यकर्त्यांच्या अडवणुकीबाबतही उत्तर द्यायला पाहिजे होते. त्याबद्दल खानापूर राष्ट्रवादीच्यावतीने शिवसेना पक्षप्रमुख-मुख्यमंत्री व आघाडीच्या प्रमुखांकडे तक्रार करणार आहोत.’’

ऐनवाडीचा अपमान केला - दाजी पवार

ऐनवाडीचे उपसरपंच दाजी पवार म्हणाले, ‘‘ऐनवाडीची पाणी योजना मंजूर झाली, पूजन खासदारांच्या हस्ते घेतले. आमदारांनी पुन्हा पूजनाचा घाट घातला. लोकनियुक्त सरपंचांना बोलावले नाही. त्यामुळे त्यांनी ग्रामपंचायत व गावाचा अपमान केला आहे.’’ राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष बेनापूरचे नेते सचिन शिंदे म्हणाले, ‘‘बेनापूर योजनेच्या मंजुरीबाबत घाटमाथ्यावरील मंडळींनी पाठपुरावा केला. पाण्याचा स्रोत व अन्य सुविधांबाबत विचारणा होऊन स्वतंत्र योजना मंजूर करण्याचा प्रयत्न केला. बेनापूर, सुलतानगादेसह पाच गावांचा समावेश त्यात होता. खासदार संजय पाटील व अन्य लोकप्रतिनिधींच्या काम माध्यमातून झाले; मात्र आमदारांनी काम बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या कामांबाबत जरूर प्रयत्न करावेत व श्रेय घ्यावे; इतरांच्या कामात हस्तक्षेप करू नये.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT