Onion will come from Egypt in India
Onion will come from Egypt in India 
पश्चिम महाराष्ट्र

भारतात इजिप्तवरून येणार कांदा 

तात्या लांडगे

सोलापूर - देशातील अतिवृष्टी व पुरामुळे महाराष्ट्रासह देशातील कांदा उत्पादनात घट झाली आहे. दिवसेंदिवस कांद्याचे दर वाढत असल्याने केंद्र सरकारने आता इजिप्तहून कांदा आयात करण्याचे नियोजन केले आहे. एक लाख टन क्‍विंटल कांद्यासाठी निविदा काढली असून, काही दिवसांत कांदा देशात आणला जाणार असल्याची माहिती राज्याच्या पणन विभागातील सूत्रांनी सांगितली.

पाकिस्तानावरून कांदा येणार असल्याने मोठा गोंधळ झाला होता. त्यामुळे तुर्कस्तान अथवा इजिप्तहून कांदा आयात करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यात आता इजिप्तला पसंती देण्यात आली आहे. गरज पडल्यास आणखी कांदा आयात करण्यात येईल, असेही सूत्रांनी सांगिले. 

देशात अतिवृष्टीमुळे तब्बल 54 लाखांहून अधिक हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्याचा परिणाम कांदा लागवड आणि उत्पादनावर झाला. कोण-कोणत्या राज्यात कांद्याची लागवड किती झाली आणि अपेक्षित उत्पादन किती होईल, याची माहिती मंत्रालयातून मागविण्यात आली आहे. कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात व महाराष्ट्रातील कांदा उत्पादनात घट झाल्याने कांदा आयात केला जाणार असल्याचेही सांगण्यात आले. महाराष्ट्रात कांद्याचा दर क्‍विंटलमागे आठ हजारांवर पोचला असून, दिल्लीसह अन्य राज्यांमध्येही अशीच स्थिती आहे. 

देशातील कांदा टंचाईवर मात करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने कांदा निर्यात करण्याचे नियोजन केले आहे. मंत्रालयातून देशातील कांदा लागवड व अपेक्षित उत्पादनाची माहिती तातडीने मागविली आहे. कृषी विभागाकडून माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. 
- सुहास काळे, फलोत्पादन विकास अधिकारी, पुणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT