पश्चिम महाराष्ट्र

‘अतिरिक्त सहाय्यक संचालक’; तालुका पंचायतीत नवे पद

सकाळ डिजिटल टीम

बेळगाव : तालुका पंचायतीमध्ये यापुढे रोजगार हमी योजनेच्या सहाय्यक संचालकांसह अतिरिक्त सहाय्यक संचालक हे नवे पदही असणार आहे. राज्य शासनाने याबाबतचा आदेश बजावला आहे. त्यामुळे तालुका पंचायतीमध्ये अतिरिक्त सहायक संचालक हे नवे पद निर्माण झाले आहे. या पदावर बढतीच्या प्रतिक्षेत असलेल्या ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांना (पीडीओ) बढती मिळणार आहे.

कित्तूर तालुका पंचायत वगळता राज्यातील २२७ तालुका पंचायतींमध्ये हे नवे पद अस्तित्वात येत आहे. तालुका पंचायतीचा कारभार तालुका कार्यकारी अधिकाऱ्यांकडे असतो. तर त्यांच्या खाली रोहयो सहाय्यक संचालक असतात. राज्यात रोजगार हमी योजनेची सुरुवात झाल्यानंतर तालुका पातळीवर सर्व कामे पाहण्यासाठी तालुका प्रोग्राम ऑफिसर हे पद अस्तित्वात आले होते. नंतर त्याला कायमस्वरूपी पदनाम देत ‘रोहयो सहाय्यक संचालक’ असे करण्यात आले. पीडिओंना त्यावर बढती मिळत होती. पण तालुका पंचायतींची संख्या पाहता केवळ तीन टक्के पीडिओना ही बढती मिळत होती.

राज्यात सात हजार पीडिओ असून त्यांना बढती द्यावयाची झाल्यास सहाय्यक संचालक म्हणून तालुका पंचायतीवर बढती दिली जाते. पण बहुतेक पीडिओंना संपूर्ण सेवा कालावधीत एकही बढती मिळणे अवघड जात होते. त्यामुळे ही समस्या दूर करण्यासाठी नव्या २२७ अतिरिक्त सहाय्यक संचालक पदांची निर्मिती केली आहे. आता बढतीच्या प्रतीक्षेत असलेल्या पीडीओंना संधी मिळेल.

प्रत्येक तालुका पंचायतीच्या व्याप्तीमध्ये ५० हून अधिक ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यामुळे प्रत्येक पंचायतीमध्ये रोजगार हमी योजनेची कामे पाहणे सहाय्यक संचालकांना शक्य नसल्याने हे नवे पद अस्तित्वात आले आहे. ग्रामपंचायतींकडून हाती घेण्यात येणाऱ्या सर्व रोजगार हमी योजनेच्या कामावर दोन्ही अधिकारी मिळून लक्ष ठेवले सोपे जाणार आहे.

१३ तालुक्यात पदे भरणार

बेळगाव जिल्ह्यात १४ तालुका पंचायती असून कित्तूर वगळता इतर १३ तालुका पंचायतीमध्ये लवकरच ही पदे भरली जाणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT