पश्चिम महाराष्ट्र

वेळकाढूपणा केला तर खबरदार...

मोहन कोळी

पटवर्धन कुरोली (जि. सोलापूर)  : पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूर) येथील भीमा नदीवरील बंधाऱ्याच्या भराव्याची दुरुस्ती न केल्यास आठ ते दहा गावांतील लोकांना पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येणार आहे. याबाबत प्रशासन वेळकाढूपणा करीत असल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 

सलग दोन वर्षांच्या दुष्काळाने होरपळून गेलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी परतीच्या पावसाने दिलासा दिला आहे. मात्र, याच परतीच्या पावसात आलेल्या पुरामुळे बंधाऱ्याचा भरावा वाहून गेला आहे. त्याचबरोबर बंधाऱ्यालगत असणाऱ्या उत्तम नाईकनवरे या शेतकऱ्याची पिकासहीत जमीन वाहून गेली आहे. या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. बंधाऱ्याचा भरावा तर जवळजवळ 200 ते 250 फूट लांब वाहुन गेला आहे. त्या ठिकाणी 40 ते 50 फूट खोल खड्डा पडला आहे. परतीचा पाऊस भरपूर झाल्याने दीड महिन्यापासून शेतीसाठी पाणी उचलणे बंद होते. परंतु, आता शेतकऱ्यांचे पाणी उचलणे सुरू झाले आहे. तसेच बंधाऱ्यावरील भाळवणी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तसेच इतर गावच्या पाणीपुरवठा योजना सुरू आहेत. त्यामुळे नदीतील पाणी कमी होऊ लागले आहे. तसेच बंधाऱ्यातून व बाजूनेही पाणी मुबलक वाहत आहे. यामुळे येत्या 15 दिवसांत नदी कोरडी पडण्याची शक्‍यता आहे. बंधाऱ्याच्या वरील पटवर्धन कुरोली, पिराची कुरोली, तरटगाव, खळवे, आव्हे, जांबुड, भाळवणी व पाच गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना या बंधाऱ्यातील पाण्यावर अवलंबून आहेत. तसेच आठ ते दहा गावांतील शेतीसाठी याच बंधाऱ्यातून पाणी उचलले जाते. जर बंधाऱ्याच्या भराव्याची दुरुस्ती न केल्यास या गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येणार आहे. यासाठी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन या बंधाऱ्याचा भरावा भरून घ्यावा, अशी मागणी होत आहे. 

पावसाळा संपून दोन महिन्यांचा कालावधी झाला आहे. त्यामुळे शेतीसाठी पाण्याची गरज भासू लागली आहे. जर बंधाऱ्याच्या भराव्याची दुरुस्ती केली नाही तर पाणी वाहून जाईल आणि पुन्हा दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होणार आहे. वेळीच दखल न घेतल्यास बळिराजा शेतकरी संघटनेच्या वतीने उग्र आंदोलन उभा करू. 
-माऊली जवळेकर, जिल्हाध्यक्ष, बळिराजा शेतकरी संघटना 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

Latest Maharashtra News Updates : ..मग महाराष्ट्रात भाषे वरून भांडणे का लावली जात आहेत? - संजय राऊतांचा सवाल!

Farmer Situation : औसा तालुक्यातील शिवणी (बु.) येथील वृद्ध शेतकरी दांपत्य ओढताहेत हाताने कोळपे

टीआरपीमध्ये अचानक वर आली 'ही' मालिका; 'या' मालिकांना टाकलं मागे; अभिनेत्याने केली खास पोस्ट

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

SCROLL FOR NEXT