Repeal Farm Laws : शेतकऱ्यांच्या लढाऊ वृत्तीचा विजय sakal media
पश्चिम महाराष्ट्र

Repeal Farm Laws : शेतकऱ्यांच्या लढाऊ वृत्तीचा विजय

केंद्र सरकारने शेतकरीवर्गात केलेल्या तीन कायद्याच्या विरोधात रयत संघटनेसह देशभरातील विविध शेतकरी संघटनांनी 11 महिने आंदोलन केले

सकाळ वृत्तसेवा

निपाणी : केंद्र सरकारने शेतकरीवर्गात केलेल्या तीन कायद्याच्या विरोधात रयत संघटनेसह देशभरातील विविध शेतकरी संघटनांनी 11 महिने आंदोलन केले. तरीही केंद्र सरकारला जाग आली नाही. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांनी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार केला होता. अखेर सरकारला नमते घ्यावे लागले असून हा शेतकऱ्यांच्या लढावू वृत्तीचा विजय असल्याचे मत चिक्कोडी जिल्हा राज्य संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी व्यक्त केले. केंद्र सरकारने शुक्रवारी (ता. १९) शेतकऱ्यांविरोधातील तीन कायदे मागे घेतले आहेत. त्यानिमित्त चिक्कोडी जिल्हा संघटनेतर्फे येथील धर्मवीर संभाजी चौकात आनंदोत्सव साजरा केला. त्या प्रसंगी पोवार बोलत होते.

राजू पोवार म्हणाले, निवडणूका समोर ठेवून आता मोदी सरकारने तीन काळे कृषी कायदे मागे घेतले. पण जे अनन्वित अत्याचार बळीराजावर केले गेले. ज्या पध्दतीने त्यांना देशद्रोही म्हटले गेले. जो खिळे-तारांचा विळखा घातला गेला. जीपच्या टायर खाली चिरडले गेले, हे शेतकरी कधीच विसरू शकणार नाही. हा मोदी सरकारच्या अत्याचार, अनाचार व प्रचंड अहंकारावर शेतकऱ्यांच्या लढाऊ वृत्तीचा, धैर्याचा आणि एकजुटीचा विजय आहे. अजूनही १४८ एकर जमीन खरेदीचा कायदा मागे घेतला नाही.

शिवाय शेतकरीआंदोलनात बळी गेलेल्या वारसांना मदत निधी मिळण्यासह उर्वरित शेतकऱ्यांच्या समस्या सुटेपर्यंत संघटनेचे आंदोलन सुरूच राहणार आहे. त्यासाठी भविष्यात शेतकऱ्यांनी अशाच प्रकारची एकजूट ठेवणे आवश्यक आहे.

निपाणी शहर अध्यक्ष उमेश भारमल यांनी, शेतकरी विरोधामधील काळ्या कायद्यांबाबत विविध शेतकरी संघटनांनी निरंतरपणे आंदोलन केले आहे. त्यांच्या आंदोलनाला यश मिळाले असून यापुढील काळातही शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगितले. प्रवीण सूतळे यांनी, तब्बल अकरा महिने आंदोलन केल्यानंतर शेतकर्‍यांचा विजय झाला आहे. शेतकऱ्यांच्या जनजागृतीमुळे सरकारला नमते घ्यावे लागले आहे. हा सर्वांच्या एकजुटीचा विजय असल्याचे सांगितले. बाळासाहेब हदीकर यांनी, हा शेतकऱ्यांचा नैतिक विजय असल्याचे सांगितले.

यावेळी सुभाष नाईक, नामदेव साळुंखे, इस्माईल मुल्ला, इरफान मुल्ला, महादेव शेळके, एजाज मुल्ला, यासीन मुल्ला, दिलीप कांबळे, युवराज केस्ती, साहिल कांबळे, पांडुरंग कोळी, बाळकृष्ण पाटील, काशीम मुल्ला, महेश पाटील, तानाजी पाटील, सुनील गाडीवड्डर, बाळासाहेब पाटील यांच्यासह रयत संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navgaon ZP School: गरीब विद्यार्थ्यांची शाळा झाली नरकयात्रा... शौचालय बंद, इमारत ढासळलेली, मुंबईजवळ ही परिस्थिती तर...?

Latest Marathi News Updates : नंदुरबारमध्ये येणाऱ्या निवडणुकीत मतदान न करण्याचा शेतकऱ्यांचा पवित्रा

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये मुसळधार! 'पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मुत्यू'; कामावरून घरी येत हाेता अन्..

कुख्यात गुंडाचा खून करून नातेवाईकांना भेटण्यासाठी बीअर बारमध्ये बसले, कोल्हापूर पोलिसांवर गेम करणाऱ्यांचा झाला करेक्ट कार्यक्रम

Asia Cup 2025 Super Four Scenario: भारतीय संघ पात्र, पाकिस्तानची बहिष्कारची धमकी; मग, उर्वरित ३ संघ कसे ठरणार?

SCROLL FOR NEXT