पृथ्वीराज चव्हाण Sakal
पश्चिम महाराष्ट्र

राज्यात घडलेल्या चुकीच्या घटनांचे घड्याळ आता उलट फिरवणार आहे का? : पृथ्वीराज चव्हाण

'निलंबनाची कारवाई झालेली नसताना नव्या मुख्यमंत्र्यांना शपथ देणे हेच चुकीचं होतं'

सकाळ डिजिटल टीम

'निलंबनाची कारवाई झालेली नसताना नव्या मुख्यमंत्र्यांना शपथ देणे हेच चुकीचं होतं'

मागील काही दिवसांपासून राज्यातील सत्तासंघर्ष वाढला आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. राज्यात उद्धव ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने आले असून न्यायालयाकडून निर्णय आल्याने सत्तासंघर्ष कायम राहणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णय प्रक्रियेवर आता कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते सांगलीत बोलत होते.

राज्यातील सत्तासंघर्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची दिरंगाई अनाकलनीय आहे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचे काय चाललंय हेच कळत नाही. राज्यात घडलेल्या चुकीच्या घटनांचे घड्याळ आता उलट फिरवणार आहे का? असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला. न्यायालाकडून निकाल येईल असं अपेक्षित होतं. पण राज्यातील हा सत्तासंघर्ष फारच लांबलचक आणि गुंतागुंतीचा झाला आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.

पुढे ते म्हणाले की, निलंबनाची कारवाई झालेली नसताना नव्या मुख्यमंत्र्यांना शपथ देणे हेच चुकीचं होतं. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवडही होऊन गेलेली आहे. पण आता या घटना पुन्हा मागे घेता येणार आहेत का, असंही त्यांनी विचारलं आहे.

दरम्यान, राज्यात उद्धव ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. मात्र न्यायालयाकडून कोणताही निर्णय होऊ शकला नाही. सुनावणीवेळी शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांनी १० व्या सूचीचा मुद्दा उपस्थित करत, पक्षांतरबंदी कायदा हा असंतोष विरोधी कायदा असू शकत नाही, असा युक्तिवाद केला. तर उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी, या प्रकरणांचा निकाल आपणच द्यावा, मोठ्या घटनापीठाकडे हे प्रकरण सोपवण्याची गरज नाही, असं मत मांडलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानला जय शाह अन् ICC ची भीती! Asia Cup वर बहिष्कार टाकण्याचा विचार सोडला?

Latest Marathi News Updates : जोगेश्वरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर दुचाकी ला लागली आग

Side Effects of Overuse of Antibiotics: प्रतिजैविक औषधांचा अंदाधुंद वापर धोकादायक तज्‍ज्ञ डॉक्‍टरांच्या परिषदेत विस्‍तृत चर्चा

Barshi Fraud News : शेअर बाजारात गुंतवणुकीचे अमिष; बार्शीत १ कोटी ७० लाख रुपयांची फसवणूक, तीन महिलांसह सात जणांवर गुन्हा

Pune Traffic : शहरात पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT