Raju Shetti vs Jayant Patil esakal
पश्चिम महाराष्ट्र

जयंत पाटलांचा 'त्या' कारखान्यांवर दबाव; राजू शेट्टींचा आरोप, निर्णय न झाल्यास काट्यावरच ठिय्या मारण्याचा दिला इशारा

निर्णय न झाल्यास काट्यावरच ठिय्या मारणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

सकाळ डिजिटल टीम

सांगली जिल्ह्यातील बहुतांश कारखान्याचे वाढीव दर देण्याची मानसिकता आहे.

नवेखेड : राजारामबापू कारखान्याने (Rajarambapu Sugar Factory) ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ५७ कोटी रुपयांचा हिशेब द्यावा, इतर कारखाने ज्यादा दर देण्याच्या तयारीत असताना जयंत पाटील त्यांच्यावर दबाव आणत आहेत, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी पत्रकार परिषदेत केला.

बोरगाव तालुका वाळवा येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, राजारामबापू कारखान्याच्या चार युनिटने मिळून मागील हंगामात १७ लाख टनाचे गाळप केले त्यांच्याकडे ३१ मार्च अखेर ११ लाख ५३ हजार क्विंटल साखर शिल्लक होती. त्यावेळच्या साखरेच्या मूल्यांकन दराप्रमाणे ३३६० रुपये प्रति क्विंटल इतके होते. एक एप्रिलनंतर साखरेच्या दरात पुन्हा वाढ झाली. जवळपास ३६६० रुपये प्रतिक्विंटल पर्यंत गेली.

क्विंटलला तब्बल ३०० रुपये त्यांना जादा मिळाले आहेत. ही रक्कम जवळपास ५७ कोटी रुपये इतकी होते. त्यातील फक्त शंभर रुपये टनाला आम्ही मागत आहोत हा आमचा गुन्हा आहे काय, १.५५ इतकी रिकव्हरी बी हेवी सिरप पासून तयार केलेल्या इथेनॉल ला वापरली आहे. त्यातून २२ कोटी रुपये नेट नफा मिळाला आहे. तर विदेशी दारूवरील कर कारखान्याने १७८ कोटी इतका भरला आहे.

तर, देशी दारू वरील करासाठी कारखान्यात तब्बल ५९ कोटी मोजले आहेत इतकी रक्कम करासाठी भरली जात असेल तर त्यामध्ये नफा नाही का, त्यातून मिळणारा नफा शेतकऱ्यांना दिला जातो का, हा प्रश्न अनुत्तरित आहे. याशिवाय इथेनॉल वीज प्रेसमड कंपोस्ट रेक्टिफाय स्पिरिट या सर्वातून मिळणारे उत्पन्न आम्ही जमेत धरलेले नाही. कारखान्यात कारखानदार शेतकऱ्यांच्या जीवावर इतके पैसे मिळवत असतील, एफआरपी सोडून आम्ही शंभर रुपये जास्त मागत आहे. सांगली जिल्ह्यातील बहुतांश कारखान्याचे वाढीव दर देण्याची मानसिकता आहे.

परंतु, जयंत पाटील यांचा त्यांच्यावर दबाव आहे अशी माहिती आम्हाला सर्वांनी दिली आहे त्यामुळे त्यांच्याच कारखान्यावर काटा बंद आंदोलनाची सुरवात असेल सुरुवातीला उद्या निर्णय व्हावा, अशी अपेक्षा आहे निर्णय न झाल्यास आंदोलन सुरूच राहील. यानंतर कृष्णा, क्रांती कारखाना आमच्या रडारवर असेल. आजच्या काटा बंद आंदोलनाला मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहणार आहेत. निर्णय न झाल्यास काट्यावरच ठिय्या मारणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT