Raju Shetti esakal
पश्चिम महाराष्ट्र

'उद्या तोडगा निघाला नाही तर एकही वाहन रस्त्यावर फिरू देणार नाही'; सांगलीतील कारखानदारांना राजू शेट्टींचा इशारा

सांगली जिल्ह्यात दराबाबत कारखानदारांची (Sugar Factory) रविवारी (ता. २६) बैठक आहे.

सकाळ डिजिटल टीम

पोरं एकमेकांच्या उरावर बसायला लागली तर पालकाची जबाबदारी आहे की नाही मध्यस्थी करायची.

सांगली : ‘‘गत वर्षीच्या हंगामात तीन हजारांहून अधिक मागितले. ज्या कारखान्यांनी ३ हजारांच्या आत दिले, त्यांनी १०० रुपये; तर ३ हजारांहून अधिक दर दिला आहे, त्या कारखान्यांनी प्रतिटन ५० रुपये द्यावेत. चालू हंगामात जाणाऱ्या उसाला एफआरपी अधिक शंभर रुपये देण्याचा तोडगा कोल्हापूर जिल्ह्यात निघाला आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा हाच फॉर्म्युला सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी स्वीकारावा,’’ अशी मागणी स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.

सांगली जिल्ह्यात दराबाबत कारखानदारांची (Sugar Factory) रविवारी (ता. २६) बैठक आहे. त्यात निर्णय न झाल्यास एक वाहनही फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. कोल्हापुरात (Kolhapur) आंदोलन यशस्वी झाल्यानंतर सांगली जिल्ह्यातील ऊस उत्पादकांच्या प्रश्नांबाबत शेट्टी यांनी भूमिका मांडली. या वेळी महेश खराडे, संदीप राजोबा उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले, ‘‘सांगलीतील बैठकीत रविवारी निर्णय झाला तर चांगले आहे; अन्यथा दोन्ही जिल्ह्यांतील ऊस उत्पादक आंदोलन करतील. या वर्षीची उचल विनाकपात घेणार आहे. कोणी कितीही मोठा नेता असला तरी आम्ही त्याच्या कारखान्यावर आंदोलन करून रक्कम वसूल करू. आता आम्ही मागे हटणार नाही.

रविवारच्या बैठकीत निर्णय घ्या; अन्यथा आंदोलनाची सुरवात साखराळे येथील राजारामबापू कारखान्यावरून करू, त्यानंतर क्रांती आणि सोनहिरा कारखान्यांवर मोर्चा असेल. कोणत्याही कारखान्याला सुटी देणार नाही. शनिवारी (ता. २५) राजारामबापू कारखान्यावर होणारे आंदोलन निर्णय होईपर्यंत स्थगित केले आहे.’’

‘पालकमंत्र्यांनी तोडगा काढावा’

‘‘रविवारी तोडगा निघाला नाही तर रस्त्यावर एकही वाहन फिरू देणार नाही. पोलिसांनी कायदा- सुव्यवस्थेच्या नावाखाली मध्ये येऊ नये. पालकमंत्र्यांनी तोडगा काढावा. पोरं एकमेकांच्या उरावर बसायला लागली तर पालकाची जबाबदारी आहे की नाही मध्यस्थी करायची,’’ असा सवालही शेट्टी यांनी पालकमंत्री खाडेंचे नाव न घेता केला.

लुंग्या-सुंग्याच्या सर्टिफिकेटची गरज नाही...

‘‘माझ्या एका हाकेवर हजारो लोक रस्त्यावर उतरतात, हेच माझे सर्टिफिकेट आहे. कुण्या लुंग्या-सुंग्याच्या सर्टिफिकेटची आवश्‍यकता नाही. सदाभाऊ काय म्हणतोय त्यावर उत्तर द्यायला, मी आलो नाही. माझे कार्यकर्ते त्याला उत्तर देतील. माझे कार्यकर्ते त्याच्यापेक्षा मोठे आहेत,’’ असा टोला शेट्टी यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

तिथे जाऊन संसार... विदेशात सेटल व्हायला का तयार नाहीये उमेश कामत? प्रियाला म्हणाला- तुला जायचं असेल तर जा पण...

Latest Marathi News Live Update : हवामान खात्याकडून रायगडला अवकाळी पावसाचा इशारा

IPL सुरू असतानाच दक्षिण आफ्रिकेच्या स्टार खेळाडूची अचानक निवृत्तीची घोषणा, वार्षिक करारातून वगळ्यानंतर घेतला निर्णय; म्हणाला...

Iran Hormuz Strait Toll : इराणने हॉर्मूझच्या सामुद्रधुनीवर सुरु केला टोलनाका; एक जहाज सोडण्याचे घेत आहे तब्बल 'इतके' कोटी

SCROLL FOR NEXT