Rohit Pawar on Sadabhau Khot esakal
पश्चिम महाराष्ट्र

राज ठाकरे भाषणात भाजपाचे बोल बोलतात; रोहित पवारांचा घणाघात

महाराष्ट्रातील जनता उत्तर प्रदेशाची नाही; रोहित पवार

सकाळ डिजिटल टीम

सांगली: धर्माच्या नावावर व्यक्तिगत लाभासाठी राजकारण करत असाल तर, महाराष्ट्राची लोक काही उत्तर प्रदेशाची लोक नाहीत त्यांना सर्व कळते. याचे उत्तर ते देतीलच असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिला. आज ते सांगली दौऱ्यावर आहेत.

पुढे ते म्हणाले, मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज ठाकरे बोलत आहेत. आज सामान्य लोकांच्या बाबतीत बोलण्याची गरज आहे. त्यावर न बोलता ते धर्मावर बोलत आहेत. पण धर्म हा वैयक्तिक विषय आहे. आणि या विषयावर राजकारण व्यक्तिगत लाभासाठी करत असाल तर महाराष्ट्राची लोक काही उत्तर प्रदेशाची लोक नाहीत त्यांना सर्व कळते याचे उत्तर ते देतीलच असे वक्तव्य रोहित पवार यांनी केले आहे.

राज ठाकरे यांची पूर्वीची भाषणे ही भाजप विरोधातील होती. पण आता त्यांची भाषणं ऐकली तर भाजपाचे म्हणणं ते बोलत असल्याचं लोकांच म्हणणं आहे असा टोलाही त्यांनी लगावला. तुम्ही भाजपाचे म्हणणे बोलत असाल तर लोकांना ते सर्व कळत आहे असेही ते म्हणाले.

भाजप पोलखोल यात्रेवर दगडफेक झाली याविषयी बोलताना पवार म्हणाले, भाजप हे बऱ्याच यात्रा काढत असतात. त्याची कायम दुटप्पी भूमिका असते असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: अमरावतीच्या सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा संप कायम

SCROLL FOR NEXT