sadabhau khot.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

सदाभाऊ खोत यांचा केंद्राला घरचा आहेर

सकाळवृत्तसेवा

सांगली ः माजी कृषी मंत्री, आमदार सदाभाऊ खोत यांनी केंद्र शासनाच्या कृषी धोरणावर जोरदार टीका केली आहे. कांदा आयातीचे धोरण, खाद्यतेलाच्या आयात शुल्कात नियोजित कपात आणि त्यामुळे तेलबिया बाजारावर होणारा परिणाम या अनुषंगाने त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील, अशी भिती व्यक्त करणारे निवेदन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि सार्वजनिक वितरणमंत्री पियुष गोयल यांना लिहले आहे. 

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना संकट काळात आधार देण्याची गरज आहे. त्यासाठी कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी, आयातीवर नियंत्रण ठेवावे आणि कांदा साठवुकीबाबतचे निर्बंध कमी करावेत. साठवणुकीवर निर्बंध हे केंद्राने नुकत्याच मंजूर केलेल्या कृषी विधेयकाच्या विरोधी निर्णय ठरेल, अशी भूमिका त्यांनी श्री. गोयल यांना पाठवलेल्या निवेदनात मांडली आहे.

त्यात म्हटले आहे, की महाराष्ट्र हे कांदा उत्पादनातील अग्रेसर राज्य आहे. सुमारे सव्वासहा लाख हेक्‍टर क्षेत्रावर कांदा पिकवला जातो. 118 लाख टन कांद्याचे उत्पादन होते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी केंद्राच्या कृषी धोरणाचे स्वागतच केले आहे. या स्थितीत केंद्राने कांद्याची आयात सुरु केली आणि निर्यात थांबवली आहे. त्याचवेळी कांदा व्यापाऱ्यांवर छापे मारले गेले आहेत. कांदा साठवणुकीवर निर्बंध आणले आहेत.

महाराष्ट्रातील प्रत्येक बाजार समितीत 200 ते 300 टन कांद्याची आवक होते. त्यामुळे साठवणुकीवर निर्बंध कसे आणणार? त्यामुळे अडचणी वाढतील. हा विषयच कृषि विधेयकाच्या विरोधात आहे. त्याचा परिणाम कांद्याच्या किंमतीवर होतोय. त्यामुळे कांदा उत्पादकांना आधार द्या. कांद्यावरील निर्यातबंदी उठवा. आयातीवर नियंत्रण आणा, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना पत्र पाठवून कृषी विधेयकाची आठवण करून दिली आहे. सोबतच, तेलबियांची निर्यात करण्याच्या धोरणावर टीका केली आहे. त्यात म्हटले आहे, की यंदा सोयाबीन, सूर्यफूल, भूईमूगाला किमान आधारभूत किंमतीपेक्षा जास्त दर येण्याची अपेक्षा आहे, मात्र सरकार त्याची खरेदी करायला तयार नाही. दुसरीकडे तेल आयातीचे धोरण राबवण्याची तयारी सुरु आहे. त्यासाठी आयात शुल्कात कपात केली जाणार आहे. असे केल्यास देशातील तेलबियांच्या किंमती गडगडतील. त्यांची खरेदी थांबेल. अशाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT