Sagareshwar is closed to tourists, picnickers and wildlife lovers 
पश्चिम महाराष्ट्र

सागरेश्‍वरला पर्यटक, सहली, निसर्गप्रेमींची वर्दळ बंदच 

स्वप्नील पवार

देवराष्ट्रे : देशातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य व हरणांचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यात राज्य व परराज्यातून पर्यंटक व शालेय सहली निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यास येतात. मार्चपासून कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे शासन निर्णयाने अभयारण्य बंद आहे. अभयारण्य प्रशासनास मिळणारे मिळणारे लाखोंचे उत्पन्न बुडाले. निसर्गाचा आनंद घेण्यास येणारे पर्यटक व निसर्गप्रेमी यांचा हिरमोड झाला. 

यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्य वन्यजीव विभागास दरवर्षी लाखोंचे उत्पन्न मिळते. सह्याद्रीच्या कुशीत असलेले अभयारण्य श्रावणात हिरवाईने फुलते. हरणांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे त्यांचे दर्शन व छोटे छोटे धबधबे, प्राचीन हेमाडपंथी मंदिर, श्री क्षेत्र दक्षिण काशी सागरेश्वर देवस्थाननजीक असल्याने राज्य व परराज्यातून अभयारण्य पाहण्यास पर्यटकांची गर्दी होते. 

अभयारण्याची निर्मिती वृक्षमित्र धों. म. मोहिते यांचा ध्यास व लोकसहभागातून झाली. अभयारण्याचे क्षेत्रफळ 10.87 चौरस किलोमीटर आहे. या ठिकाणी असणारा किर्लोस्कर पॉइँट, फेटा, पोइंट, महालगुंड, मृगविहार, छत्री बंगला, बांबुकुटी, बालोद्यान याठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी चांगली सुविधा करण्यात आहे. निसर्गरम्य अशी अनेक ठिकाणे आहेत. 

येथे 142 प्रजातीच्या पक्ष्याची नोंद करण्यात आली आहे. साळुंखी, सुगरण, सूर्यपक्षी, पिंगळा, सुतारपक्षी, कोकीळ, पोपट, पावशा आदी पक्षी आहेत. पक्षी निरीक्षक येथे येतात. भारतात आढळणारे सर्वात लहान फुलपाखरू ग्रास जुय्वेल येथे आहे. 

दिवंगत माजी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी अभयारण्यासाठी भरघोस निधी देऊन अभयारण्याचा कायापालट केला. वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. पर्यटकांना राहण्यासाठी बांबू हाउसची उत्तम सोय आहे. त्यामुळे सागरेश्वर वन्यजीव विभागाच्या उत्पन्नात वाढ झाली. या उत्पन्नातून वन्यजीव प्रशासनास 50 टक्के व ग्राम परिस्थितीकीय विकास समितीस 50 टक्के मिळत होते. त्यातून सागरेश्वर वन्यजीव विभाग अभयारण्यात सोयी सुविधासाठी खर्च करतात. ग्राम परिस्थितीकीय विकास समिती गावातील सोयी सुविधांसाठी खर्च करते. 

कोरोनामुळे अभयारण्य बंद आहेत. त्यामुळे यावर्षी अभयारण्य व गावातील होणाऱ्या विकासास ब्रेक लागला. निसर्गप्रेमींना अभयारण्य बंद असल्याने निसर्गाचा आस्वाद घेता येणार नाही. 

कोरोनामुळे सागरेश्वर अभयारण्य शासन आदेशाने मार्चपासून बंद आहे. श्रावणात हजारो पर्यटक, सहली व निसर्गप्रेमी येतात. चांगले उत्पन्न मिळते. त्यातून अभयारण्य विकासाचा आराखडा केला जातो. परंतु यंदा लाखोंचे उत्पन्न बुडाले. त्याचा परिणाम विकासावर होणार आहे.'' 

अनिल जेरे, सहाय्यक वनसंरक्षक, यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्य 

संपादन : प्रफुल्ल सुतार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hyderabad Gazette : मराठा समाजाला दिलासा! ‘हैदराबाद गॅझेट’ विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

Education News : टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास नोकरी सोडावी लागणार; शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण

'एक दिवाने की दिवानियत' चित्रपटाच्या डबिंगदरम्यान रडला हर्षवर्धन राणे

Athletics Championships: नीरज-अर्शदकडून निराशा, पण भारताच्या सचिनचं पदक फक्त ४० सेंटीमीटरने हुकलं; जाणून कोण ठरलं विजेता

Latest Maharashtra News Updates : तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळाच्या अध्यक्षपदावरुन संजय शिरसाठ यांची हकालपट्टी करा, तृतीयपंथी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT