परतीच्या पावसामुळे भातशेतीचे मोठे खोळंबली  sakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगली : परतीच्या पावसामुळे काढणी खोळंबली

भात पीक झाले जमीनदोस्त; शेतकऱ्यांवर दुहेरी संकट, शिराळा तालुक्यातील स्थिती

सकाळ वृत्तसेवा

सांगली : शिराळा तालुक्यात रोज रोज पडणाऱ्या परतीचा पावसामुळे खरीप हंगामातील पिकांची काढणी खोळंबली असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापणीला आलेले भाताचे पीक कोलमडून पडले असून शेतात पाणी साचल्याने काही ठिकाणी भातपिकास मोड आले आहेत. जुलै-ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे अगोदरच वारणा नदीकाठावरील खरीप कुजून गेला. त्यातून उरला सुरलेला नदीकाठचा परिसर वगळता शेतशिवरतील खरीप काढणीला आला असून परतीच्या पावसामुळे त्याची देखील धूळधाण झाली आहे. भात पीक जमीनदोस्त झाले तर भुईमुंगाच्या शेंगांना मोड आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास वाया जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. भातशेती धरणीला टेकली असून, भात उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

भात शेतीचे आगार म्हणून संबोधल्या जाणाऱ्या शिराळा पश्चिम भागात सध्या भात, भुईमूग, सोयाबीन आदी पिकांची काढणी सुरू असून रोज पडणाऱ्या पावसामुळे ती खोळंबली आहे. भातपीक काढण्याचा हंगाम उलटला तरी परतीच्या पावसाने भात पिकावर पाणी फिरवले. ढगफुटीसदृश पावसामुळे शेतात उभं असलेल्या भात पिकांची धूळधाण झाली आहे. शेतकऱ्यांना पिके काढता येत नसल्याने शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होणार आहे. अगोदर अतिवृष्टी व आता परतीचा पाऊस यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. ऐन काढणीच्या मोसमात आलेली पिके परतीच्या पावसाने गेल्याने शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होणार आहे.

अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळाली नसल्याने आता पुन्हा परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळणार का ? असा प्रश्न शेतकरी वर्गातून विचारला जात आहे. पीक कुजून जाण्याच्या मार्गावर तालुक्यात १२ हजार ९०० हेक्टरवर खरिपाची पेरणी करण्यात आली होती. त्यातील साधारणपणे ६ हजार ५०० हेक्टर वरील खरीप महापुरामुळे अगोदरच कुजून गेला आहे. साधारणपणे ९० ते १२० दिवसांचे असणारे भात पीक अजूनही शेतातच असून तेही कुजून जाण्याच्या मार्गावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

Dombivali News : आमदार राजेश मोरे यांनी पलावा पुलाचे उद्घाटन केले आणि पूल बंद झाला

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

१७ वर्षांनंतरही का आहे 'जाने तू... या जाने ना' ही चित्रपट सर्वांचाच लाडका सिनेमा– जाणून घ्या खास कारणं

SCROLL FOR NEXT