Eknath Shinde
Eknath Shinde esakal
सोलापूर

मी २४ तास जनतेसाठी काम करणारा मुख्यमंत्री - एकनाथ शिंदे

सकाळ डिजिटल टीम

राज्यातील नवं सरकार हे जनतेचं आणि सर्वसामान्यांचं आहे - मुख्यमंत्री शिंदे

राज्यातील नवं सरकार हे जनतेचं आणि सर्वसामान्यांचं आहे. आपल्या राज्यातील अनेक लोकांमध्ये बुद्धिमत्तेचे प्रमाण अधिक आहे. याचा उपयोग आपण राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी करु, असं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. आज ते पंढरपुरात जनतेशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी पंढरपूरच्या विकास आराखड्यासंदर्भात भाष्य केलं. पंढरपूरचा विशेष विकास आराखडा बनवणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिलं आहे.

यावेळी ते म्हणाले की, मी २४ तास जनतेसाठी काम करणारा मुख्यमंत्री आहे. महाराष्ट्रातील जनतेचा सेवक असल्याच्या भावनेनं मला हे काम करायच आहे. त्यामुळे या कामात मला जनतेची मदत लागणार आहे, तुम्ही ती कराल असा विश्वासही आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

पुढे ते म्हणाले की, सरकारची प्रतिमा वाढली पाहिजे. शासना आणि प्रशासन ही रथाची दोन चाके असल्याने ती समान वेगाने धावायला हवीत. दोन्ही चाके गतीने धावली तरच राज्याच्या विकासालाही गती येईल. पंढरपुर हे आपल्यासारख्या गोरगरिबांचे दैवत आहे. १० लाखांपेक्षा अधिक लोक दिसत आहेत. या वारकऱ्यांसाठी स्वच्छ निरोगी वातावरण असलं पाहिजे. त्यासाठी पंढरपूरच्या विकासासाठी एक विशेष विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे भविष्यात या तीर्थक्षेत्र सर्व सोयीनियुक्त असेल, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune School: स्कॉरलशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: शोले, गांधी अन् शक्ती.. राज ठाकरेंना कसं लागलं चित्रपटांचं वेड? बिग बींच्या 'त्या' सीनबद्दल म्हणाले...

शक्तिपीठ महामार्ग : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात खदखद का आहे?

SCROLL FOR NEXT