sakal
सोलापूर

वीर धरणातून नीरा नदीत 23 हजार क्यूसेकने विसर्ग सुरू

नीरा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने सर्व धरणे भरली आहेत. त्यामुळे वीर धरणातून नीरा नदीत आज दुपारी दोन वाजता पाणी सोडण्यात आले आहे

प्रदीप बोरावके : सकाळ वृत्तसेवा

माळीनगर : नीरा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने सर्व धरणे भरली आहेत. त्यामुळे वीर धरणातून नीरा नदीत आज दुपारी दोन वाजता पाणी सोडण्यात आले आहे. आज सायंकाळी सहा वाजता नीरा नदीत 23 हजार 185 क्यूसेक्स इतका विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने नीरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नीरा प्रणालीतील भाटघर धरणात यंदाच्या मोसमात आजपर्यंत 23.50 टीएमसी, वीरमध्ये 8.77 टीएमसी, नीरा देवधरमध्ये 11.73 टीएमसी, गुंजवणीमध्ये 3.64 टीएमसी मिळून एकूण 47.64 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. भाटघर धरण रविवारी शंभर टक्के भरल्याने ते ओव्हरफ्लो झाले.

त्यामुळे त्यातून वीर धरणात विसर्ग सोडण्यात आला. वीर धरणात 11 सप्टेंबरला 75.19 टक्के, 12 सप्टेंबरला 79.60 टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. नीरा खोऱ्यातील धरणांच्या परिसरात पावसाचे प्रमाण व आवक वाढत असल्याने वीर धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली. आज सकाळी नऊ वाजता वीर धरण 95.68 टक्के भरले.

त्यामुळे वीरमधून नीरा नदीत दुपारी दोन वाजता चार हजार 637 क्यूसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात झाली. दुपारी चार वाजता त्यात वाढ करून नऊ हजार 274 क्यूसेक्स विसर्ग करण्यात आला. सायंकाळी पाच वाजता विसर्गात 13 हजार 911 क्यूसेक्सपर्यंत वाढ करण्यात आली. त्यानंतरच्या एक तासात तब्बल 10 हजार क्यूसेक्सची वाढ करून सायंकाळी सहा वाजता 23 हजार 185 क्यूसेक्सने नीरा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नीरा पात्रात कोणीही जाऊ नये, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटची आठवण

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

Rain-Maharashtra Latest Live News Update: मराठवाड्यात मोठी धरणे आणि प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याच्या दिशेने

Jalgaon Crime : जळगावात कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना; पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करत संपवले जीवन

होम्बळे फिल्म्सने 'कांतारा: अध्याय 1' मध्ये गुलशन देवय्या यांची 'कुलशेखर' या भूमिकेत केली घोषणा

SCROLL FOR NEXT