Funds Esakal
सोलापूर

अतिवृष्टीचे 18 कोटी शासनजमा ! मार्चएंडमुळे परत गेली रक्‍कम

खर्च न झाल्याने अतिवृष्टीचा निधी शासनाकडे जमा झाला

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूरसह राज्यातील 17 जिल्ह्यांना मागील वर्षी अतिवृष्टीचा फटका बसला. फेब्रुवारी ते मे आणि जून ते ऑक्‍टोबर 2020 या काळात दोनदा अतिवृष्टी झाली. त्याच्या भरपाईपोटी शासनाने सोलापूर जिल्ह्यासाठी सुमारे सहाशे कोटींचा निधी दिला. मात्र, मार्चएंडपर्यंत निधी खर्च न झाल्याने अतिवृष्टीच्या भरपाईसह जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी आणि शोध व बचाव कार्याचा निधी, असे एकूण 18 कोटी दोन लाख रुपये शासनाला परत करावे लागल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली.

जिल्ह्यातील अक्‍कलकोट, पंढरपूर, मोहोळ, करमाळा, माढा, सांगोला, माळशिरस, बार्शी यासह अन्य तालुक्‍यांतील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके अतिवृष्टीच्या पाण्यात वाहून गेली. तर 23 जणांचा वाहून जाऊन मृत्यू देखील झाला होता. मदत व बचाव कार्यासाठी सरकारने पैसे दिले. तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी कर्ज काढून सरकारने मदत केली. "एसडीआरएफ' दोन टप्प्यात मदत दिली. तलाठ्यांच्या माध्यमातून पंचनामे करून जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरकारला मदतीचे प्रस्ताव पाठविले.

तलाठ्यांच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा बॅंक खाते क्रमांक व नुकसानीची रक्‍कम तसेच क्षेत्र तहसीलदारांना कळविण्यात आले. त्यानुसार बॅंकांकडे भरपाईच्या याद्या पाठविण्यात आल्या. मात्र, अजूनही जिल्ह्यातील अंदाजित दहा ते बारा हजार शेतकऱ्यांना मदतीची रक्‍कम मिळालीच नाही. त्यामध्ये बॅंक खाते क्रमांक चुकीचा असलेल्यांची संख्या मोठी आहे. तर काही ठिकाणी तलाठ्यांकडून शेतकऱ्यांची नावेच पाठविण्यात आली नाहीत, असाही आरोप शेतकरी करीत आहेत. मदतीचा दुसरा टप्पा विलंबाने मिळाल्याने त्याची शहानिशा करायला अधिकाऱ्यांना वेळच मिळाला नाही. त्यामुळे आता अखर्चित निधी शासनाला परत पाठवावा लागला आहे.

नुकसान होऊनही शेतकरी गप्पच

ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, परंतु त्यांना मदत मिळाली नाही, ज्यांचा बॅंक खाते क्रमांक चुकीचा आहे, त्यांनी तलाठ्यांशी संपर्क करून त्यात दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने त्या वेळी केले होते. त्यानुसार दुरुस्ती करूनही अनेकांना मदत मिळाली नाही. दोन-चार हजारांसाठी खूप हेलपाटे मारण्यापेक्षा मदतच नको, अशी भूमिका बऱ्याच शेतकऱ्यांनी घेतल्याचेही पाहायला मिळाले. आता ज्यांना मदत मिळाली नाही, त्यांच्यासाठी जिल्हा प्रशासन पाठपुरावा करणार का? काही दिवसांपूर्वी अवकाळीमुळे जिल्ह्यातील दोन हजार 900 हेक्‍टरवरील पिकांच्या नुकसानीचाही अहवाल प्रशासनाला कृषी विभागाने पाठविला आहे. त्यांना मदत मिळणार की नाही, असे प्रश्‍न शेतकरी विचारू लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Marathi News Live Updates : माढ्यात सीना नदीत ५ तरुण बुडाले

Sugarcane Mechanization: ऊसतोड मजुरांच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचा यंत्रांकडे मोर्चा; आधुनिक हार्वेस्टरमुळे वेळ व खर्चात बचत

Banjara ST reservation protest: येलदरी जलाशयात बंजारा समाजाचे जलसमाधी आंदोलन; विनोद आडे यांच्या आमरण उपोषणाला व्यापक पाठिंबा

Manwat Health Services Review: सुट्टीच्या दिवशी आरोग्य सुविधांची तपासणी; महालक्ष्मी सणात महिला कर्मचाऱ्यांची ड्युटीमुळे तारांबळ

SCROLL FOR NEXT