सोलापूर

बेलाटीला मिळाले दुष्काळापासून स्वातंत्र्य! श्रमदानाचा झाला फायदा

अरविंद मोटे

सोलापूर: पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेले बेलाटी (ता. उत्तर सोलापूर) हे गाव आज दुष्काळमुक्त झाले आहे. गावाने श्रमदानातून राबविलेल्या विविध उपक्रमामुळे बेलाटी गावाला दुष्काळापासून कायमचे स्वातंत्र्य मिळाले आहे.

अवघ्या तीन हजार लोकसंख्येचे बेलाटी (ता. उ.सोलापूर) हे गाव पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत राज्यात प्रथम आल्यामुळे सर्वत्र गाजले आहे. या गावाने अवघ्या 45 दिवसांत श्रमदानातून ही किमया केली आहे. मात्र, त्यापूर्वीच्या काही वर्षांची मेहनतही त्या पाठीमागे आहे. या गावचे तत्कालीन सरपंच सुनील काटकर यांनी गावकऱ्यांबरोबर घेऊन सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने हा बदल घडवला आहे. सोलापूरपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर माळरानावर वसलेले हे गाव एकेकाळी ओसाड होते. पाण्याचे दुर्भिक्ष्य पाचवीला पूजलेले होते. या गावाने श्रमदानातून व विविध सरकारी योजनांमधून 12 किलोमीटरचे नाला सरळीकरण केले.

जलयुक्त शिवारच्या माध्यमातून गावच्या शिवारातील पाणी शिवारातच मुरले पाहिजे हे तत्व पाळले. अगदी गावचे सांडपाणी घरोघरी शोषखड्डे करून गावातच मुरवले. वेळोवेळी वृक्षारोपण करून 2600 झाडांचे संगोपण केले. 2018 पासून वेगवेगळ्या सरकारी योजनांच्या माध्यमातून गावाच्या कायापालटाचा ध्यास घेतला व गावकऱ्यांनी सलग 45 दिवस श्रमदान करून पाणी फाउंडेशनचा वॉटरकप मिळवला. यासाठी नियमित चारशे ते पाचशे गावकरी श्रमदान करत होते. जलयुक्त शिवार योजनेतून विविध ठिकाणी "पाणी आडवा पाणी जिरवा मोहिम' राबवली. केतन शहा यांच्या माध्यमातून जैन संघटनेच्या वतीने जेसीबी मशीनची मदत मिळाली. अनेक पदाधिकारी, शासकीय अधिकारी कृषी खाते यांनी डिझेलची व्यवस्था केली. यामुळे गाव सुजलाम सुफलाम बनले. ज्या गावात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य होते, त्या गावात आज ऊस, द्राक्ष, डाळिंब तसेच भाजीपाला पिकवला जात आहे. गावाला दुष्काळापासून स्वातंत्र्य मिळाले आहे.

ठळक बाबी

- पाणी फाउंडेशच्या स्पर्धेत राज्यात प्रथम

- सर्व गाव हागणदारीमुक्त, केरोसीनमुक्त

- ग्रामस्वच्छता योजनेचा प्रथम पुरस्कार

- ओढे नाले यावर 21 बंधारे, 3 पाझर तलाव

- गावात स्मार्ट स्कूल, पंधरा वर्ग खोल्या, प्रत्येकाला पक्के घर

तत्कालीन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, राजेंद्र भारुड, अरुण डोंगरे यांच्यासह प्रवीणसिंह परेदशी यांच्यासारख्या दूरदृष्टी असलेल्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आम्हाला लाभले. गावकऱ्यांनीही सहकार्य केले. यामुळे हा बदल घडू शकला. सातत्याने प्रयत्न केला तर अल्पावधीत हा बदल प्रत्येक गावात घडवता येऊ शकतो.

- सुनील काटकर, माजी सरपंच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

Latest Marathi News Live Update : मुंबईत कंत्राटदाराचा सातवा बळी, सरकारची ८६ हजार कोटींची थकबाकी

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

SCROLL FOR NEXT