Kharif Sowing esakal
सोलापूर

खरीप पेरणीची मिटली चिंता! ओलावा कमी झाल्यावरच शेतकऱ्यांनी करावी पेरणी

दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला आहे. पेरणीसाठी व पेरणी झालेल्या पिकांसाठी हा पाऊस पोषक आहे. पण, आता शेतकऱ्यांनी जमिनीला वापसा आल्यानंतरच पेरणी करावी. शेतात साचलेले पाणी बाहेर काढून द्यावे, जेणेकरून त्याठिकाणी पाणथळ तयार होणार नाही.

तात्या लांडगे

सोलापूर : मायनस १३ टक्क्यांकडे वाटचाल करणारे धरण आता मागील दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे प्लसकडे वाटचाल करू लागले आहे. दोन दिवसांत धरणात जवळपास सव्वा टीएमसी पाणी आले आहे. ८ जुलैला मायनस १२.७७ टक्के पाणीसाठा होता, आता धरण मायनस १०.५२ टक्क्यांवर आले आहे. पावसामुळे जमिनीत ओलावा वाढला असून ओल कमी झाल्यावरच शेतकऱ्यांनी बियाणांची पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

जिल्ह्यातील रब्बी पिकांची विशेषत: उसाचे क्षेत्र वाढण्यास आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यात उजनी धरणाचाच सर्वाधिक वाटा राहिला आहे. जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने धरणातील पाणीसाठा मायनस १२.७७ टक्क्यांपर्यंत खाली गेला होता. पण, ८ जुलैला दुपारी दोन वाजता सुरु झालेला पाऊस ९ जुलैच्या रात्री उशिरापर्यंत सुरुच होता. धरणात दौण्डवरून २० हजार क्युसेक वेगाने पाणी धरणात येत होते. १२ तासांत ०.८४ टीएमसी पाणी धरणात जमा झाले आहे. धरण परिसरात चांगला पाऊस पडत असल्याने धरणात पाणी येत आहे. समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील खरीपाची पेरणीही वेगात सुरु आहे. आतापर्यंत तीन लाख ७२ हजार हेक्टरपैकी (उसासह) एक लाख ६३ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात सोयाबीन, भुईमूग, उडीद, बाजरी, मका, तूर या खरीप पिकांचा समावेश आहे. आता दोन दिवसांपासून पाऊस असल्याने वाफसा आल्यानंतर उर्वरित क्षेत्रावरील पेरणी होईल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

६० हजार मे.टन खताचा साठा

युरिया २३ हजार ८८३ टन, डीएपी पाच हजार १४२ टन एनपीकेएस १६ हजार ७१९ टन, एमओपी साडेतीन हजार टन आणि एसएसपी साडेअकरा टनापर्यंत खताचा जिल्ह्यात सध्या साठा आहे. शेतकऱ्यांनी अधिक प्रमाणात रासायनिक खताचा वापर करू नये. जेणेकरून जमिनीची उत्पादकता कमी होऊन पुढे ती नापिक होऊ शकते, असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.

ओल कमी झाल्यावरच करावी पेरणी

दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला आहे. पेरणीसाठी व पेरणी झालेल्या पिकांसाठी हा पाऊस पोषक आहे. पण, आता शेतकऱ्यांनी जमिनीला वापसा आल्यानंतरच पेरणी करावी. शेतात साचलेले पाणी बाहेर काढून द्यावे, जेणेकरून त्याठिकाणी पाणथळ तयार होणार नाही.

- बाळासाहेब शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suresh Dhas: ''माझा मुलगा सुपारीसुद्धा खात नाही'', 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'च्या आरोपावर सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

एक नायक तर दुसरी खलनायिका; टीव्हीचे गाजलेले चेहरे पुन्हा भेटीला येणार; कोण आहेत ते? प्रेक्षकांनी सांगितली नावं

Jalgaon News : खेळता खेळता हरवला जीव! जळगावात १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Electricity Supply: अदानी हटाव..., प्रीपेड मीटरला ग्राहकांचा नकार; महावितरण खाजगीकरणाविरोधात कॉंग्रेसचे आंदोलन

Pune Market Committee : संचालक मंडळ बरखास्त करून ईडी व इन्कम टॅक्स चौकशी करा; राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष विकास लवांडे यांची मागणी

SCROLL FOR NEXT