govermnet job sakal
सोलापूर

Goverment Job : सरकारच्या 3 विभागाच्या भरतीतून जमा झाले, २६६ कोटींचे शुल्क ! जागा 35 हजार अन् 27 लाखांवर...

तलाठी (महसूल), जिल्हा परिषदा व आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया सुरु असून तलाठी भरतीची परीक्षा पार पडली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे वर्ग- ३ व ४च्या १० हजार ९४९ जागा भरल्या जात आहेत. त्यासाठी आतापर्यंत सव्वादोन लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. शुक्रवारी (ता. २२) अर्ज करण्याची मुदत संपणार आहे. अवघ्या तीन शासकीय विभागांच्या पदभरतीतून तब्बल २६५.५४ कोटींचे शुल्क सरकारला मिळाले आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

राज्यात मागील साडेचार महिन्यांपूर्वी गृह विभागातर्फे पोलिस भरती पार पडली. त्यावेळी १८ हजार ८३१ जागांसाठी तब्बल १८ लाख उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यातूनही कोट्यवधींचे शुल्क मिळाले आहे. आता देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शिंदे-फडणवीस सरकारने जाहीर ७५ हजार पदांची मेगाभरती सुरु झाली आहे.

तलाठी (महसूल), जिल्हा परिषदा व आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया सुरु असून तलाठी भरतीची परीक्षा पार पडली आहे. काही दिवसांत जिल्हा परिषदांची भरती पार पडेल आणि त्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागाची पदभरती होईल.

प्रत्येक भरतीसाठी रिक्त जागांच्या तुलनेत उमेदवारांच्या अर्जांची संख्या किमान तिप्पट ते पाचपट पाहायला मिळत आहे. प्रत्येक भरतीसाठी खुल्या प्रवर्गाला एक हजार तर मागासवर्गीय उमेदवारांना अर्जासाठी ९०० रुपयांचे शुल्क भरावे लागत आहे. आतापर्यंत तीन विभागाच्या भरतीतून सरकारच्या तिजोरीत अंदाजे २६५ कोटी रुपयांचे शुल्क जमा झाले आहे. दरम्यान, उर्वरित शासकीय विभागांमध्ये ४० ते ६० हजार पदांची आणखी भरती होणार असून त्यातूनही अंदाजे ५०० कोटींहून अधिक शुल्क जमा होणार आहे.

विभागनिहाय स्थिती...

विभाग जागा अर्ज शुल्क

तलाठी ४६५७ १०.४१ लाख १०० कोटी

झेडपी १९,४६० १४.५१ लाख १४५ कोटी

आरोग्य १०,९४९ २.१३ लाख २२.५४ कोटी

एकूण ३५,०६६ २७,०५,७१३ २६५.५४ कोटी

राज्यात दुष्काळी स्थिती; तरी शुल्क कमी नाही

१ जून ते १८ सप्टेंबर या कालावधीत राज्यातील साडेपाचशेहून अधिक महसूल मंडळांमध्ये सरासरीच्या ४० टक्के सुद्धा पाऊस झालेला नाही. शेतकरी आत्महत्या कमी झालेल्या नाहीत, बळीराजाला खरीप नुकसानीची भरपाई (विमा संरक्षित रक्कम) मिळालेली नाही. रब्बी पेरणीसह बॅंकांच्या कर्जाचा हप्ता कसा फेडायचा, मुलांचे शिक्षण, मुलीचा विवाह याचीही बळीराजाला चिंता आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक विभागाच्या परीक्षेसाठी एक हजार ते ९०० रुपयांचे शुल्क भरायचे कसे, हा प्रश्न तरुणांसमोर आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांचे सरकार काय सकारात्मक निर्णय घेईल का, याकडे तरुणांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : 'its very serious issue' सर्वोच्च न्यायालयात वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद, CJI सूर्यकांतही संतापले, खटला अतिशय गंभीर

Student Security Issue : विद्यार्थ्यांची सुरक्षा ऐरणीवर; शिकवणी वर्ग अधिनियम अस्तित्वात येणार कधी?

Maharashtra Winter Update : राज्यातील थंडी गायब की गारठा कायम राहणार? हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज समोर

PIFF Mahotsav : ‘पिफ’ १५ जानेवारीपासून रंगणार; सुमारे १४० चित्रपट दाखविले जाणार

होता स्‍कार्फ म्‍हणून वाचला गळा! 'बिबट्याचा वृद्ध महिलेवर जीवघेणा हल्ला; गवतातून झडप, जिवाच्या आकांताने आरडाओरडा अन्..

SCROLL FOR NEXT