Jyoti Utsav
Jyoti Utsav 
सोलापूर

यंदा लक्षवेधी पवित्र ज्योती उत्सव होणार नाही; 65 वर्षांपासूनची परंपरा कोरोनामुळे खंडित

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : दरवर्षी रक्षाबंधनचा सण साजरा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे तीनपासून पूर्वभागातील भाविकांचे आकर्षण असते ती तोगटवीर क्षत्रिय समाजाच्या पवित्र ज्योती उत्सवाचे. तालबद्ध ठेका धरून देवीची स्तोत्रं म्हणत या ज्योती उत्सवात सहभागी होणाऱ्या आठ फंडांचा हा ज्योती उत्सव या वर्षी कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर रद्द करण्यात आल्याची माहिती तोगटवीर क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण उदगिरी यांनी दिली. 

कोरोना महामारीविरुद्ध सर्व जगच लढा देत आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या आदेशानुसार यंदाच्या वर्षी नारळी पौर्णिमेला होणारा पवित्र "ज्योती उत्सव' साजरा करण्यात येणार नाही. परंपरेप्रमाणे दरवर्षी नारळी पौर्णिमा व श्रावण शुद्ध षष्ठी हे देवी प्रतिष्ठापना दिवस मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरे केले जातात. परंतु कोरोना महामारी रोखण्यासाठी म्हणून मंदिरात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. या वर्षी प्रतिपदेपासून दुग्धाभिषेक तसेच दुर्गाष्टमी व पौर्णिमा होमहवन अशा सर्व पूजा समजाच्या वतीने नित्य नियमाने केल्या जातील; परंतु कोणत्याही पूजेवेळी पुढील दोन महिने मंदिरात सार्वजनिक दर्शनास बंदी राहील व नैवेद्यही स्वीकारले जाणार नाही, याची तोगटवीर क्षत्रिय समाज बांधवांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही श्री. उदगिरी यांनी केले आहे. 

या विषयाकरिता घेण्यात आलेल्या बैठकीस समाजाचे उपाध्यक्ष रामचंद्र पुडूर, सहसचिव संतोष उदगिरी, खजिनदार नागनाथ कोंतम, सल्लागार समितीचे अरुण चिंता, आनंद बडगंची, डॉ. नारायण रंगम, श्रीनिवास गुर्रम आदी उपस्थित होते. 

65 वर्षांपासून सुरू आहे ज्योती उत्सव 
शहरात 1954 मध्ये तोगटवीर क्षत्रिय समाजाची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून अखंडित ज्योती उत्सव साजरा केला जातो. या उत्सवात सोमवार पेठ गट्टी फंड, पेद्दी फंड, जोडबवण्णा चौक येथील चिला फंड, नंगी फंड, डक्का फंड, चौडेश्‍वरी फंड, साखर पेठ गट्टी फंड व नलगेशी फंड असे आठ फंड पहाटे तीन वाजता सहभागी होतात. सोवळे नेसून सहभागी झालेल्या या फंडांमधील भाविकांच्या तालबद्ध स्तोत्रपठणाने परिसर भक्तिमय होऊन जातो. पहाटे पाच वाजता साखर पेठ येथे सर्व फंड एकत्र येऊन कन्ना चौकातील श्री चौडेश्‍वरी मंदिरात आरती करून ज्योती उत्सवाची सांगता होते. मात्र या वर्षी कोरोनामुळे सर्व उत्सव रद्द करण्यात आल्याने समाजबांधवांमध्ये अनुत्साह दिसत आहे, अशी माहिती समाजाचे सहसचिव संतोष उदगिरी यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT