सोलापूर : आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जातील, असे केंद्र सरकारने तर आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेतूनही उपचार होतील, असे राज्य सरकारने स्पष्ट केले. मात्र, कोरोनाबाधित प्रथमदर्शनी सहजासहजी ओळखता येत नसल्याने खबरदारी म्हणून बहूतांश रुग्णालयांना टाळेच लावण्यात आले आहे. दरम्यान, पीपीई कीटचा तुटवडा असल्याने रुग्णालये बंद असून कोणत्या रुग्णालयातून कोरोनाबाधितांवर उपचार करायचे, याचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.
हेही नक्की वाचा : सकाळ ब्रेकिंग ! लॉकडानमधील आमदारांच्या वेतनाला कात्री
देशातील गोरगरिबांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळावेत या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्यमान भारत योजना सुरु केली. त्यानुसार राज्यातील 53 लाख 63 हजार कुटूंब तर देशातील 10 कोटी 74 लाख कुटूंब पात्र ठरली. तत्पूर्वी, राज्यात महात्मा फुले योजनेअंतर्गत रुग्णांना दोन लाखांपर्यंतचे उपचार मोफत केले जातात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत कोरोनाबाधितांवर उपचार करण्याचे जाहीर केले. त्यानंतर केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजनेअंतर्गतही उपचार केले जातील, असे स्पष्ट केले. रुग्णांना दिलासा मिळाला, मात्र सुरक्षिततेचे कारण पुढे करीत राज्यातील 900 पैकी बहूतांश रुग्णालयांना टाळेच लावण्यात आले आहे. परंतु, सर्व सोयी-सुविधा देऊन कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी कोणते हॉस्पिटल सुरु करायचे, याचा निर्णय संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी घेतील, असेही डॉ. शिंदे म्हणाले.
हेही नक्की वाचा : लॉकडाउन वाढणार ! एमपीएससीची परीक्षा पुन्हा लांबणीवर
जिल्हाधिकाऱ्यांना निर्णयाचे संपूर्ण अधिकार
कोरोनाबाधित रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार करण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला. त्यानंतर केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजनेतूनही उपचार करण्यास मान्यता दिली. परंतु, डॉक्टरसह नर्सिंग स्टाफसाठी पीपीई कीट उपलब्ध नसल्याने दवाखाने बंद असल्याचे चित्र आहे. योजनेतील कोणते रुग्णालय सुरु करायचे, याचे संपूर्ण अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
- डॉ. सुधाकर शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुष्यमान भारत योजना
हेही नक्की वाचा : विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत उच्च शिक्षणमंत्री म्हणाले...
'आयुष्यमान भारत'मध्ये वाढणार 100 रुग्णालये
आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पाच लाखांपर्यंत उपचार घेण्यासाठी राज्यातील 53 लाख 63 हजार कुटूंब पात्र ठरली आहेत. या रुग्णांवरील उपचारासाठी राज्यातील 900 रुग्णालयांची निवड करण्यात आली आहे. आता त्यात आणखी 100 रुग्णालयांची वाढ केली जाणार असून आजारांची संख्याही वाढणार आहे, अशी माहिती डॉ. सुधाकर शिंदे यांनी यावेळी दिली.
हेही नक्की वाचा : जुलैनंतर सुरु होणार आगामी शैक्षणिक वर्ष
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.