mahavitaran.jpg 
सोलापूर

'या' तालुक्‍यात उद्योग बंद असल्याने महावितरणच्या महसुलात लक्षणीय घट

राजकुमार शहा

'मोहोळ(सोलापूर)ः कोरोना महामारी मूळे मोहोळ तालुक्‍यातील विविध कारखाने बंद असल्याने वीज मागणीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे महसुलात वीस टक्के तुट आली आहे. 

मोहोळ तालुक्‍यात सीना, भीमा या नद्यांसह आष्टी तलाव, कामती तलाव, उजनी डावा कालवा, या पाणी स्त्रोतामुळे तालुक्‍यात बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ऊस हे शेतकऱ्यांचे मुख्य पीक असून द्राक्ष, डाळींब ,बोर, सिताफळ, पेरू या फळबागाचे क्षेत्र ही वाढले आहे. तसेच भिमा ,जकराया व लोकनेते हे तीन साखर कारखानेही आहेत. ही पिके जगवण्यासाठी मोठ्या प्रमाणात विजेची मागणी आहे व ती वरचेवर वाढती आहे. सध्या तालुक्‍यात या पूर्वीची 21 विद्युत उपकेंद्र असून नवीन पेनुर ऍडिशनल, पोखरापूर व वाळूज या तीन नवीन उपकेंद्राचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला आहे. मोहोळ हा सर्वात जास्त विद्युत उपकेंद्र असलेला तालुका आहे. दररोज मोहोळ विभागाला 55 मिलियन युनिट विजेचा वापर होत आहे. 

मोहोळ शहर केंद्रबिंदू धरले तर 50 किलोमीटरच्या परिसरात तालुका विस्तारला आहे. तेवढ्या परिसराला सध्या विद्युत पुरवठा होत आहे. मोहोळ तालुक्‍यात असलेल्या लघुदाब ट्रान्सफॉर्मर वर ताण येऊ नये म्हणून, नवीन 466 उच्चदाब ट्रान्सफॉर्मर सुरू केले आहेत, त्यामुळे विद्युत पुरवठा विभाग सुरळीत होत आहे. शेतकऱ्यांची कामे वेळेत व्हावीत व कार्यालयावरील ताण ही कमी व्हावा यासाठी यापूर्वीच नवीन महावितरणच्या उपविभागीय कार्यालयाचा प्रस्ताव मंजूरी साठी पाठविला असून तो मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. 

आर्थिक तुट मोठ्या प्रमाणात 
उद्योग बंद असल्याचा परिणाम विद्युत महावितरण वर मोठ्या प्रमाणात झाला आहे. आर्थिक तुट मोठया प्रमाणात झाली आहे. 
- हेमंत ताकपेरे, सहायक अभियंता  
 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: धाराशिव मध्ये रात्रभर जोरदार पाऊस, तेरणा नदीला पुराचा धोका

SCROLL FOR NEXT