ऊस वाहतूकदारांना लाखो रुपयांचा गंडा! तोडणी मुकादम नॉट रिचेबल Sakal
सोलापूर

ऊस वाहतूकदारांना लाखो रुपयांचा गंडा! तोडणी मुकादम नॉट रिचेबल

ऊस वाहतूकदारांना लाखो रुपयांचा गंडा! तोडणी मुकादम नॉट रिचेबल

गजेंद्र पोळ

जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे हंगाम सुरू झाले आहेत. पण करमाळा तालुक्‍यातील अनेक वाहन मालकांच्या तोडणी मजुरांच्या टोळ्या आलेल्या नाहीत.

चिखलठाण (सोलापूर) : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे हंगाम सुरू झाले आहेत. पण करमाळा (Karmala) तालुक्‍यातील अनेक वाहन मालकांच्या तोडणी मजुरांच्या टोळ्या आलेल्या नाहीत. इतर जिल्ह्यांतील तोडणी मुकादमांनी वाहन मालकांना लाखो रुपयांचा गंडा घालून ते नॉट रिचेबल झाले आहेत. यात तालुक्‍यातील शंभरपेक्षा जास्त वाहन मालकांचे प्रत्येकी दहा ते बारा लाख रुपये बुडाल्यात जमा आहेत. यामुळे वाहन मालकांची चिंता वाढली आहे.

आपला स्वतःचा ऊस वेळेवर कारखान्याकडे गाळपास जावा, शेतीला जोडधंदा असावा म्हणून अनेक शेतकरी ट्रॅक्‍टर व ट्रकसारखी वाहने खरेदी करून या वाहन व्यवसायात उतरले आहेत. वाहनांसाठी आपली शेतजमीन गहाण ठेवून लाखो रुपयांचे बॅंका व फायनान्स कंपन्यांकडून कर्ज काढली आहेत. ऊस तोडणीसाठी नगर, बीड, जालना, यवतमाळ, परभणी जिल्ह्यातील व मध्य प्रदेशातील तोडणी मुकादमांना दहा ते बारा लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम उचल देऊन साखर कारखान्यांबरोबर तोडणी वाहतूक करार केले आहेत. अनेकांनी या व्यवसायासाठी 30 ते 35 लाख रुपये भांडवल गुंतवणूक केली आहे. मात्र, साखर कारखाने सुरू होऊन जवळपास एक महिना होत आला तरी अनेक वाहन मालकांच्या ऊस तोडणी मजुरांच्या टोळ्याच आल्या नाहीत. त्यात मुकादम नॉट रिचेबल झाल्याने मालकांची चिंता वाढली आहे. सध्या या शेतकऱ्यांची वाहने दारात धूळखात पडली असून यामुळे वाहन मालकांचे दुहेरी नुकसान झाले आहे.

मी परभणी जिल्ह्यातील गावातील तोडणी मुकादमाला जून महिन्यात सात लाख रुपये दिले. टोळी आणायला जाताना तीन लाख रुपये उचल दहा मजूर जोड्यांसाठी देणार होतो. ऑक्‍टोबर महिन्यात त्यांना ऊस तोडणीसाठी वाहन घेऊन आणायला गेलो. निघताना मुकदमाला फोन केला तेव्हापासून त्यांनी फोन बंद करून ठेवला आहे. त्या गावातून तो गायब आहे. तिथे चार दिवस थांबून रिकाम्या हाताने परत आलो.

- शहाजी जाधव, वाहन मालक, शेटफळ, ता. करमाळा

साखर कारखाने वाहन मालक शेतकऱ्यांना दोन ते चार लाख रुपये उचल देतात. त्यांची टोळी हजर झाली नाही तर उसाच्या बिलातून किंवा तोडणी बिलातून ही रक्कम वसूल करतात. पण तो वाहन मालक तोडणी मुकादमांकडून आपण दिलेली रक्कम वसूल करू शकत नाही. हे मुकादम एकापेक्षा जास्त वाहन मालकांकडून पैसे घेतात व गावातून गायब होतात. त्यांना पकडण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांच्या कुटुंबातील इतर लोक वाहन मालकांच्या नावे पळवून नेल्याची केस स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये दाखल करतात.

- नितीन तकीक, वाहन मालक, वांगी, ता. करमाळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

Shivaji Maharaj: पुण्यातील मानाचा पहिला गणपती अन् शिवरायांचं बंधन! ; मावळे मोहिमेवर जाण्याआधी घेत असत बाप्पाचं दर्शन

SCROLL FOR NEXT